Skip to main content

महसूल विभागाच्या एका पथकाने शहरात दाखल कर चुकवेगिरी करणाऱ्याचे धाबे दणानले


किनवट, ता.२५ (बातमीदार) : शहर व परिसरातील अनेक व्यापारी दुकानदारांनी वस्तू सेवा कर कायद्याखाली नोंदणी केलेली नाही. असे असूनही सदर व्यापारी हे आपला व्यापार कर बुडवून धुमधडाक्यात करीत आहेत. अशा करबुडव्या व्यापाऱ्यांच्या दुकानावर संबंधित विभागाने धाडी टाकून कडक कारवाई करावी, अशी मागणी,  जागृत नागरीकातून होत आहे.

  काही दिवसापूर्वी महसूल विभागाच्या एका पथकाने शहर व परिसरातील काही दुकानांवर धाडी टाकल्या होत्या. परंतु, या प्रकरणात पुढे काय कार्यवाही झाली हे मात्र आजपर्यंत कळू शकलेले नाही.

शहर व परिसरातील काही टेलर हे कपडे शिलाई बरोबरच आपल्या दुकानातून कपड्यांची व रेडीमेड कपड्यांची विक्री करतात. त्यांनी दुकाने व आस्थापना कायद्याअंतर्गत  टेलरिंग दुकानाची नोंदणी केलेली आहे. परंतु, व्यवसाय मात्र ते कपडे विकण्याचा करता. त्या दुकानदाराकडे वस्तू सेवा कर कायद्याअंतर्गत चे लायसनस सुद्धा नाही. सदरील टेलर हे कापड विक्री करतांना पावती सुद्धा देत नाहीत.

कर चुकवेगिरी करणाऱ्या व्यापार्‍यांच्या  प्रतिष्ठानावर  छापे टाकून त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी. त्यांनी किती कर बूडविला आहे, ते उजेडात येईल. अशी अपेक्षा जागृत नागरिकांनी व्यक्त केली आहे.


Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...