Skip to main content

शालेय जि. परिषद इमारत जमीनदोस्त प्रकरणात आमरण उपोषणाचा इशारा :-राजू पाटील सुरोशे.

किनवट (तालुका प्रतिनिधी)

 शासकीय इमारत उभी करण्यासाठी शासनाचा खर्च होत असतो तसेच एखादी इमारत किंवा व कधी पाडायची याबाबत शासनाने नियमावली ठरवून दिलेली आहे परंतु, काही शासकीय पदावर असलेले महारथी च्या आशीर्वादाने नियमाची पायमल्ली तर केली जाते. याउलट दोषी व्यक्तीला ही पाठीशी घातल्या जाते  त्याचाच एक भाग म्हणून की काय किनवट शहराजवळून जवळच असलेल्या घोटी येथील जिल्हा परिषद शालेय इमारत ही रातोरात जमीनदोस्त करण्यात आली. यासंबंधी राजू पाटील सुरोशे  यांनी वेळीच शासन दरबारी आपली कैफियत मांडली, परंतु अद्याप पर्यंत काहीही कारवाई झाली नाही, म्हणून दिनांक 24/ 2 /2021 रोजी राजू पाटील सुरोशे यांनी निवेदनाद्वारे उपोषणाचा गंभीर असा इशारा प्रशासनाला दिला आहे. सदर निवेदना  मध्ये मौजे घोटी तालुका किनवट जिल्हा नांदेड येथील शालेय इमारत जमीनदोस्त केल्या बाबत विषयाला अनुसरून दिनांक 2/2 /2021 च्या मध्यरात्री जि. प. प्रा. शाळा घोटी येथील इमारत जमीनदोस्त करण्यात आली होती. तरी अद्याप पर्यंत गटशिक्षणाधिकारी साहेब यांनी काहीही कार्यवाही केली नाही, असे निदर्शनास येत आहे. तरी दिनांक 28 /2 /2021 पर्यंत आपण संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा दिनांक 1 मार्च 2021 पासून आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा गंभीर इशारा माननीय गटशिक्षणाधिकारी साहेब किनवट, तालुका:- किनवट, जिल्हा नांदेड यांना राजू पाटील सुरोशे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. वर्तमान स्थितीची कृती ही भविष्य उज्वल बनवत असते. त्याचप्रमाणे दोषीवर कारवाई होते का ? की मग त्यामध्ये दोषी व्यक्तीला पाठीशी घातले जाते किंवा कसे?हे  येणारी वेळच सांगणार आहे हे मात्र निश्चित आहे. याकडे परिसरातील सर्वसामान्य जनता  चौकशीची म्हणजे दोषीवर कार्यवाही करण्याची वाट बघत आहे.



Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला