Skip to main content

शालेय जि. परिषद इमारत जमीनदोस्त प्रकरणात आमरण उपोषणाचा इशारा :-राजू पाटील सुरोशे.

किनवट (तालुका प्रतिनिधी)

 शासकीय इमारत उभी करण्यासाठी शासनाचा खर्च होत असतो तसेच एखादी इमारत किंवा व कधी पाडायची याबाबत शासनाने नियमावली ठरवून दिलेली आहे परंतु, काही शासकीय पदावर असलेले महारथी च्या आशीर्वादाने नियमाची पायमल्ली तर केली जाते. याउलट दोषी व्यक्तीला ही पाठीशी घातल्या जाते  त्याचाच एक भाग म्हणून की काय किनवट शहराजवळून जवळच असलेल्या घोटी येथील जिल्हा परिषद शालेय इमारत ही रातोरात जमीनदोस्त करण्यात आली. यासंबंधी राजू पाटील सुरोशे  यांनी वेळीच शासन दरबारी आपली कैफियत मांडली, परंतु अद्याप पर्यंत काहीही कारवाई झाली नाही, म्हणून दिनांक 24/ 2 /2021 रोजी राजू पाटील सुरोशे यांनी निवेदनाद्वारे उपोषणाचा गंभीर असा इशारा प्रशासनाला दिला आहे. सदर निवेदना  मध्ये मौजे घोटी तालुका किनवट जिल्हा नांदेड येथील शालेय इमारत जमीनदोस्त केल्या बाबत विषयाला अनुसरून दिनांक 2/2 /2021 च्या मध्यरात्री जि. प. प्रा. शाळा घोटी येथील इमारत जमीनदोस्त करण्यात आली होती. तरी अद्याप पर्यंत गटशिक्षणाधिकारी साहेब यांनी काहीही कार्यवाही केली नाही, असे निदर्शनास येत आहे. तरी दिनांक 28 /2 /2021 पर्यंत आपण संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा दिनांक 1 मार्च 2021 पासून आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा गंभीर इशारा माननीय गटशिक्षणाधिकारी साहेब किनवट, तालुका:- किनवट, जिल्हा नांदेड यांना राजू पाटील सुरोशे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. वर्तमान स्थितीची कृती ही भविष्य उज्वल बनवत असते. त्याचप्रमाणे दोषीवर कारवाई होते का ? की मग त्यामध्ये दोषी व्यक्तीला पाठीशी घातले जाते किंवा कसे?हे  येणारी वेळच सांगणार आहे हे मात्र निश्चित आहे. याकडे परिसरातील सर्वसामान्य जनता  चौकशीची म्हणजे दोषीवर कार्यवाही करण्याची वाट बघत आहे.



Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...