Skip to main content

"उदीष्टा शिवाय ते लिहत नाहीत उदीष्टा शिवाय ते जगतही नाहीत.... प्रा. डॉ . आनंद इंजेगावकर यांचे महेंद्र नरवाडे यांच्या प्रबोधन चळवळीतील शिलेदार पुस्तक प्रकाशना वेळी गौरोउद्गार



ता. प्र. किनवट:-दि.२१


"उदीष्टा शिवाय ते लिहतही नाहीत उदीष्टा शिवाय ते जगतही नाहीत असे गौरोउद्गार प्रा. डॉ . आनंद इंजेगावकर यांनी महेंद्र नरवाडे यांच्या प्रबोधन चळवळीतील शिलेदार या पुस्तक प्रकाशन सोहळा वेळी काढले ते पुढे बोलत होते प्रसिद्ध लेखक, कवी सांगावाकार महेंद्र नरवाडे यांनी या पुस्तकातुन प्रबोधन चळवळीत खऱ्या अर्थाने योगदान देणाऱ्या व आपले जीवन निस्वार्थपणे प्रबोधनासाठी झटणाऱ्या शहिर गायक यांचा लेखा जोखा मुलाखतीच्या माध्यमातुन त्यांनी अंत्यत मुद्देसुदपणे मांडला व सन्मान केला. 

'प्रबोधन चळवळीतील शिलेदार' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा म. ज्यो. फुले महाविद्यालयातील मातोश्री कमलताई ठमके सभागृहात पार पडला कार्यक्रमाच्या सुरवातीस धम्म वंदना घेण्यात आली व नंतर वामनदादा कर्डक अकादमीचे प्रा. सुरेश पाटील यांनी सुरेल आवाजात गीत सादर केले मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके हे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन विचार मंचावर प्रा.डॉ. आनंद इंजेगावकर ( परभणी), अखिल भारतीय बौध्द उपासक संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा कौशल्य प्रकाशनचे प्रकाशक डॉ. अशोक गायकवाड( औरंगबाद), इंजीनीयर डॉ. विवेक मवाडे हे होते .

कार्यकमाचे प्रास्ताविक रुपेश मुनेश्वर यांनी मांडले या नतंर महेंद्र नरवाडे यांचा सुजाता नरवाडे सह सपत्निक शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व उपस्थीत सर्वांनी शुभेच्छा दिल्या यावेळी प्रमुख उपस्थिती प्रसिद्ध नाटककार यादव तामगाडगे गुरुजी, नाटककार ,लेखक प्रा.डॉ. अंबादास कांबळे, अॅड मिलींद सर्पे, टाईम्स ऑफ किनवटचे राजेश पाटील माजी मुख्याद्यापक कवी रामजी काबंळे, योगा शिक्षक देवीदास मुनेश्वर, सुभाष बोड्डेवार ,गायक शाहीर क्षिरसागर हाटकर, शाहीर नरेंद्र दोराटे,कावळे सर, डॉ. प्रकाश रायघोळ, डॉ. प्रेमलता नरवाडे, शशीकांत नरवाडे, प्रशांत दुथडे, प्रा. लक्ष्मीकांत दुथडे, तुषार नरवाडे, राजा तामगाडगे, आदी उपस्थीत या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्र संचालन उत्तम कानिंदे यांनी केल तर आभार क्रांतिसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक व शालेय वृत्त एपचे रमेश मुनेश्वर यांनी आभार मानले हा कार्यक्रम कोव्हीड१९ च्या नियमांचे पालन करत व्यवस्थितरित्या पार पडला.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.