Skip to main content

"उदीष्टा शिवाय ते लिहत नाहीत उदीष्टा शिवाय ते जगतही नाहीत.... प्रा. डॉ . आनंद इंजेगावकर यांचे महेंद्र नरवाडे यांच्या प्रबोधन चळवळीतील शिलेदार पुस्तक प्रकाशना वेळी गौरोउद्गार



ता. प्र. किनवट:-दि.२१


"उदीष्टा शिवाय ते लिहतही नाहीत उदीष्टा शिवाय ते जगतही नाहीत असे गौरोउद्गार प्रा. डॉ . आनंद इंजेगावकर यांनी महेंद्र नरवाडे यांच्या प्रबोधन चळवळीतील शिलेदार या पुस्तक प्रकाशन सोहळा वेळी काढले ते पुढे बोलत होते प्रसिद्ध लेखक, कवी सांगावाकार महेंद्र नरवाडे यांनी या पुस्तकातुन प्रबोधन चळवळीत खऱ्या अर्थाने योगदान देणाऱ्या व आपले जीवन निस्वार्थपणे प्रबोधनासाठी झटणाऱ्या शहिर गायक यांचा लेखा जोखा मुलाखतीच्या माध्यमातुन त्यांनी अंत्यत मुद्देसुदपणे मांडला व सन्मान केला. 

'प्रबोधन चळवळीतील शिलेदार' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा म. ज्यो. फुले महाविद्यालयातील मातोश्री कमलताई ठमके सभागृहात पार पडला कार्यक्रमाच्या सुरवातीस धम्म वंदना घेण्यात आली व नंतर वामनदादा कर्डक अकादमीचे प्रा. सुरेश पाटील यांनी सुरेल आवाजात गीत सादर केले मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके हे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन विचार मंचावर प्रा.डॉ. आनंद इंजेगावकर ( परभणी), अखिल भारतीय बौध्द उपासक संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा कौशल्य प्रकाशनचे प्रकाशक डॉ. अशोक गायकवाड( औरंगबाद), इंजीनीयर डॉ. विवेक मवाडे हे होते .

कार्यकमाचे प्रास्ताविक रुपेश मुनेश्वर यांनी मांडले या नतंर महेंद्र नरवाडे यांचा सुजाता नरवाडे सह सपत्निक शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व उपस्थीत सर्वांनी शुभेच्छा दिल्या यावेळी प्रमुख उपस्थिती प्रसिद्ध नाटककार यादव तामगाडगे गुरुजी, नाटककार ,लेखक प्रा.डॉ. अंबादास कांबळे, अॅड मिलींद सर्पे, टाईम्स ऑफ किनवटचे राजेश पाटील माजी मुख्याद्यापक कवी रामजी काबंळे, योगा शिक्षक देवीदास मुनेश्वर, सुभाष बोड्डेवार ,गायक शाहीर क्षिरसागर हाटकर, शाहीर नरेंद्र दोराटे,कावळे सर, डॉ. प्रकाश रायघोळ, डॉ. प्रेमलता नरवाडे, शशीकांत नरवाडे, प्रशांत दुथडे, प्रा. लक्ष्मीकांत दुथडे, तुषार नरवाडे, राजा तामगाडगे, आदी उपस्थीत या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्र संचालन उत्तम कानिंदे यांनी केल तर आभार क्रांतिसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक व शालेय वृत्त एपचे रमेश मुनेश्वर यांनी आभार मानले हा कार्यक्रम कोव्हीड१९ च्या नियमांचे पालन करत व्यवस्थितरित्या पार पडला.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...