Skip to main content

//उपविभागीय दंडाधिकारी न्यायालयाकडे प्रशांत वाठोरे यांची जन सामान्य हित याचीका दाखल//






(ता .प्र. किनवट )


शहरात उद्भवणारा सार्वजनिक उपद्रव किनवट शहरात आज गंभीर रुप धारण केले आहे यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आलेच आहे 

त्यामध्ये गाढवांच्या सार्वजनिक रस्त्यावरच्या मस्ती मुळे सर्वसामान्याचे अपघात होत आहेत. तसेच किनवट शहरवासी व व परिसरातील नागरिक त्यांच्या दुचाकी सार्वजनिक रस्त्यावर बेशिस्तपणे लावत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होत आहे. तसेच किनवट शहरातील सार्वजनिक रस्त्यावर गल्लोगल्ली सदृढ शरीर धारण करणारे भिकारी हे तर फार सर्वसामान्याला भावनिक साद देऊन ते जनसामान्यांना एक प्रकारचा त्यांच्या मनाच्या विरुद्ध कृती करण्यास भाग पाडून सार्वजनिक उपद्रव देत आहेत. यासंबंधातील अनेक बातम्या अनेक वर्तमानपत्रांमध्ये छापून सुद्धा आलेल्या आहेत किनवट वासी व परिसरातील जनसामान्यांच्या त्रासाचे कारण हे वर्तमानपत्राच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत जाते म्हणून की काय परिसरातील नामवंत पत्रकार श्री प्रशांत रतन वाठोरे यांनी 2 फेब्रुवारी 2021 रोजी उपविभागीय दंडाधिकारी साहेब किनवट यांच्या न्यायालयात फौजदारी कलम 133 व भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे त्यांच्या विधिज्ञ मार्फत जनसामान्यांच्या हितासाठी सार्वजनिक उपद्रव थांबवण्याबाबत याचिका दाखल केली आहे सदर याचिकेवर काय निर्णय होईल याची किनवट शहरातील व परिसरातील जनसामान्य हे कुतूहलाने वाट बघत आहेत. सार्वजनिक उपद्रव काढून टाकणे हे स्थानिक स्वराज्य संस्थेचा कर्तव्य आहे या कर्तव्य मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था कसूर करत आहे का ? की नागरिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजेच किनवट नगरपालिकेच्या आदेशाचे पालन करत नाहीत याचाही खुलासा हे याचिकेद्वारे जनसामान्यांना कळणार आहे.




सदर याचिकेमध्ये याचिकाकर्त्यांनी त्याच्या याचिकेमध्ये 'गेल्या अनेक दिवसापासून किनवट शहरात व परिसरात सार्वजनिक रस्त्यावर मोकाट गाढवे फिरत असल्यामुळे अनेक अपघात झाले आहेत" म्हणजे सर्वसामान्य माणसाला जीवघेणा त्रास सहन करावा लागत आहे सदर सार्वजनिक उपद्रव काढून टाकण्याचे अधिकार हे नगरपालिकेला आहेत.तसेच किनवट मध्ये व परिसरात मोकाट गुरे, डुकरे, यामुळे अपघाताचे प्रमाण तर वाढलं आहे परंतु ते करत असलेल्या घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच शहरात सार्वजनिक उपद्रव देणार कुत्रे, डुकरे, गायी-म्हशी मोठ्या प्रमाणात सर्व सामान्य नागरिकांना उप्द्व्याप देत आहेत. तसेच तसेच गाढवाच्या मस्ती मुळे अनेक अपघात झाले आहेत शहरात सार्वजनिक रस्त्यावर वाहने दुचाकी कोठेही पार्क केल्या जाते त्यामुळे ट्रॅफिक जामचा प्रभाव दिसून येत आहे. बेशिस्तपणे वाहन पार्क करणार्‍यावर नगरपालिका तसेच पोलीस प्रशासन कारवाई करू शकते सदर सार्वजनिक उपद्रव त्वरित थांबविण्यात यावा यासाठी परिसरातील नामवंत पत्रकार श्री प्रशांत वाठोरे यांनी दंडाधिकारी साहेब यांच्या न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे सदर याचिकेची दखल न्यायदंडाधिकारी साहेबांनी घेतलेली आहे किनवट वासियांचा सार्वजनिक उपद्रव लवकरच कमी होणार आहे असे आज तरी आपल्याला म्हणावे लागेल कृती आणि अपेक्षा यामध्ये फरक आहे सदर सार्वजनिक उपद्रव कमी होण्यासाठी प्रशासन काय खंबीरपणे पावले उचलते याकडे किनवट वाशी व परिसरातील जनसामान्यांचे लक्ष लागून आहे.



Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला