Skip to main content

किनवट शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती विविध उपक्रमानी साजरी करून अभिवादन

(शहर प्रतिनिधी किनवट) :

कुळवाडी भुषण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जंयती किनवट मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .

सुरवातीला सकाळच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज जयंती सार्वजनिक उत्सव समिती तर्फे छ.शिवाजी चौक , डॉ. बाबा साहेब आंबेडकर चौक, जिजामाता चौक, ते गोकुंदा पर्यंत भव्य बाईक रॅली काढण्यात आली त्या नंतर जुन्या नगर पालीकेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा, रंग भरण स्पर्धा, भाषण स्पर्धा, भव्य आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, व नेत्र तपासणी शिबिर असे विविध उपक्रम कोवीड१९ चे नियम पाळुन घेण्यात आले व छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले 






यावेळी आमदार भिमरावजी केराम, नगराध्यक्ष आंनद मच्छेवार, उपाध्यक्ष अजय चाडावार, श्रीनिवास नेमान्नीवार, व्यंकट नेमान्नीवार,कैलास भगत, अभय महाजन, साजीद खान, अनुसया मधुकर अन्नेलवार, जहीराद्दीन खान, प्रशांत कोरडवार, सागर ताई शिंदे, बापुसाहेब तुप्पेकर, अण्णा भाऊ शेळके, किरण ठाकरे,डॉ . अरवींद भुरके, डॉ. बालाजी तेलंग, डॉ. प्रसाद सुर्वे, डॉ. वसंत बामणे, डॉ. अविनाश पवार, सतिश सोरटे, डॉ. सतिष सोरटे, डॉ. रीतेश सुर्यवंशी, डॉ . सुधाकर तहाडे यांच्या तर्फे मोफत तपासणी करण्यात आली व ओमकार ऑप्टीकल तर्फे केवळ २५० चष्मा बनवुन घेण्याची मुभा देण्यात आली.

तर भाषण स्पर्धेचे परीक्षण क्रांतिसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक शिक्षक रमेश मुनेश्वर, माणीक भवरे यांनी केल.

संयोजन समितीचे अध्यक्ष गोवींद आरसोड, कार्याध्यक्ष, प्रा. दगडु भरकड, स्वागताध्यक्ष, आशीष कराळे,संतोष डोणगे पाटील , राजु शिंदे, ज्ञानेश्वर कदम ,अजय कदम ,बाळकृष्ण कदम, सचीन कदम, आशिष कराळे, राजु सुरोशे आदींनी या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला