Skip to main content

छत्रपती शिवाजी महाराजांची जंयती विविध उपक्रमांनी साजरी होणार


 किनवट:(तालूका प्रतिनिधी) 

      छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दिं 19 फेब्रुवारी रोजी किनवट येथे विविध उपक्रमाने साजरी होणार असुन या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती सार्वजनिक शिव जयंती उत्सव समिती किनवटने केली आहे.

       या उपक्रमामध्ये रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, भाषण स्पर्धेचा समावेश असून सकाळी 7 वाजता पासून या स्पर्धा नगर परिषद किनवट च्या प्रांगणात होणार आहेत.तर दुपारी 12 ते 5 पर्यंत आरोग्य, नेत्र तपासणी व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन ओमकार ऑप्टिकल यांच्या सौजन्याने या शिबिरात तपासणी करणाऱ्या रुग्णांना 250 रुपयांमध्ये चष्मा बनवून मिळणार आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन करण्यात येणार आहे. तेव्हा जास्तीत जास्त शिवभक्तांनी याा कार्यक्रमात सहभागी व्हा असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती किनवट च्या वतीने गोविंदा रिसोड, शिवाजी पवार, आशिष का-हाळे, दगडू भरकड, सुमित माने, आकाश इंगोले, कपिल जाधव, राजू वानखेडे, श्रीकांत बेंद्रे, सचिन कदम, रितेश मंत्री यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...