Skip to main content

किनवट येथे माता रमाबाई आबेंडकर यांची जयंती साजरी



( किनवट ता.प्रतिनिधी )

           त्यागमूर्ती व अखंड स्त्री जातीला ऊर्जा स्त्रोत देणारी सर्वांची आई माता रमाई.  माता रमाई भीमराव आंबेडकर यांची १२३ वी जयंतीचे औचित्य साधून किनवट तालुक्यात तक्षशीला  बौद्ध विहारात धम्मबांधव व धम्मभगिनी शुभ्र वस्त्र परिधान करून विहारात ठीक ११ वाजता उपस्थित होते. 

          भीमयान बुद्ध विहार  परिसर समता नगर येथे  जगाला शांतीचा संदेश देणारे  महाकारुनीक,तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस धूप पूजा , पुष्पपूजा अर्पण करून त्रिशरण पंचशीला बौद्धाचार्य गंगाधर कदम यांच्या हस्ते घेण्यात आली व धम्म  वंदन घेण्यात आली. 

या वेळी उपासक पांडुरंग भगत, भीमराव गीमेकार, सिद्धार्थ पाटील, संजीवन पाटील,अभय नगराळे, अशोक वासाटे, जीवन लाठे, आनंद नगारे, रवी कावळे, भीमराव पाटील, साहेबराव वाढवे,गंगाधर कदम, सुबोध गीमेकार, अनुपम वासाटे, महेंद्र वासाटे, सागर सूर्यवंशी, प्रभाकर भगत, सुधाकर भगत, अविनाश नगराळे, राहुल गीमेकार, हर्शानंद पाटील, चांगदेव सोनुले,अर्जुन दिंडाळकर, आकाश लाठे,सुमेध गायकवाड, अंकित गायकवाड,प्रशिक पाटील, रेनुकाबाई पाटील , द्रुपताबाई मुनेश्वर, शकुंतलाबाई गीमेकार, पार्वताबाई पाटील, रंजना तामगाडगे, निलावती वासाटे, संगीताबाई कानिंदे ,शाकुलाबाई भगत, नंदाबाई दिंडाळकर ,आशाताई कदम,प्रयागबाई लाठे, कविताबाई गायकवाड,ललिताबाई कवडे, राधाबाई नगराळे   व समस्त महिला मंडळ व युवा मित्रमंडळी  कार्यक्रमास उपस्थित होते.



         रमाई तुझे उपकार कसे फेडू 

         शिकूण सारा समाज सारा एकजूट करू 

         झालेत ते अन्याय आता समजात एकीचे बीज पेरू 

       उभारूया शिक्षणाचा कल्पतरू

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...