Skip to main content

इलेक्ट्रॉनिक मीडिया सदस्य परवीन शेख यांची महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन महिला आघाडीच्या किनवट तालुका अध्यक्षपदी नियुक्ती

 


(किनवट ता .प्रतिनिधी )

गोरगरीब महिलांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या गोकुंदा येथील महिलांच्या खंबीर नेत्या तथा इलेक्ट्रॉनिक मीडिया सदस्य परवीन शेख यांची महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या किनवट तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाली

असून महिला जिल्हाध्यक्ष पद्मा गिर्हे  यांच्या हस्ते नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यांच्या या नियुक्ती बद्दल पोलिस कर्मचाऱ्यांसह विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

 किनवट तालुक्यातील  महिलावर्गाच्या विविध प्रश्नासाठी लढा देणार महिलांच खंबीर नेतृत्व म्हणून गोकुंदा येथील परवीन शेख यांची तालुक्यात ओळख आहे.

 महिलावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात परवीन शेख नेहमीच पुढाकार घेऊन महिलांना न्याय मिळून देतात तसेच

इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन 

पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक रवी वैद्य यांच्या नेतृत्वाखाली व महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष विजया बावदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली  

नांदेड जिल्हाध्यक्ष पद्मा गिरी यांनी परवीन शेख यांची महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या किनवट तालुका अध्यक्षपदी नियुक्ती केली 

असून नुकतेच नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

 महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन पोलिसांच्या कुटुंबासाठी तसेच जनतेच्या न्याय हक्कासाठी काम करणारी संघटना आहे. 

भरतीमध्ये पोलिस कुटुंबातील उमेदवाराला पाच टक्के आरक्षण तसेच रनिंग मध्ये 50 सेकंदाचा वेळ वाढवून देण्याचे काम या संघटनेने केल्यामुळे त्याचा पोलीस कुटुंबांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला त्यामुळे दिवसेंदिवस या असोसिएशनचा देशभरात विस्तार होताना दिसून येत आहे.

किनवट तालुक्यातील महिलांच्या प्रश्नासाठी मी सतत काम करत आले.

माझ्या या कार्याचे फलित म्हणून महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक रवी वैद्य, महिला प्रदेशाध्यक्ष विजया बावदाने,

 जिल्हाध्यक्ष शेख शकील महोमद युसूफ, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पद्मा गिर्हे  यांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली ती जबाबदारी पार पडण्यास मी कटिबद्ध राहील

 या असोसिएशन माध्यमातून किनवट तालुक्यातील  अन्याय  अत्याचारग्रस्त महिलांना निश्चितपणे न्याय मिळून देण्याचे काम करू 

अशी प्रतिक्रिया परवीन शेख यांनी नियुक्तीनंतर दिली आहे.

या नियुक्तीबद्दल पोलिस कर्मचाऱ्यांसह

कॉंग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष सुरेखा काळे, मनसेचे मा.तालुकाध्यक्ष नितीन मौहरे.

 इलेक्ट्रॉनिक मीडियाचे तालुकाध्यक्ष आनंद भालेराव, नासिर तगाले , राजेश पाटील,सुहास मुंडे, प्रवीण कोवे, गंगाधर कदम, अरविंद सूर्यवंशी , शेख अतीफ यांनी  परवीन शेख यांचे अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला