Skip to main content

इलेक्ट्रॉनिक मीडिया सदस्य परवीन शेख यांची महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन महिला आघाडीच्या किनवट तालुका अध्यक्षपदी नियुक्ती

 


(किनवट ता .प्रतिनिधी )

गोरगरीब महिलांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या गोकुंदा येथील महिलांच्या खंबीर नेत्या तथा इलेक्ट्रॉनिक मीडिया सदस्य परवीन शेख यांची महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या किनवट तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाली

असून महिला जिल्हाध्यक्ष पद्मा गिर्हे  यांच्या हस्ते नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यांच्या या नियुक्ती बद्दल पोलिस कर्मचाऱ्यांसह विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

 किनवट तालुक्यातील  महिलावर्गाच्या विविध प्रश्नासाठी लढा देणार महिलांच खंबीर नेतृत्व म्हणून गोकुंदा येथील परवीन शेख यांची तालुक्यात ओळख आहे.

 महिलावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात परवीन शेख नेहमीच पुढाकार घेऊन महिलांना न्याय मिळून देतात तसेच

इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन 

पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक रवी वैद्य यांच्या नेतृत्वाखाली व महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष विजया बावदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली  

नांदेड जिल्हाध्यक्ष पद्मा गिरी यांनी परवीन शेख यांची महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या किनवट तालुका अध्यक्षपदी नियुक्ती केली 

असून नुकतेच नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

 महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन पोलिसांच्या कुटुंबासाठी तसेच जनतेच्या न्याय हक्कासाठी काम करणारी संघटना आहे. 

भरतीमध्ये पोलिस कुटुंबातील उमेदवाराला पाच टक्के आरक्षण तसेच रनिंग मध्ये 50 सेकंदाचा वेळ वाढवून देण्याचे काम या संघटनेने केल्यामुळे त्याचा पोलीस कुटुंबांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला त्यामुळे दिवसेंदिवस या असोसिएशनचा देशभरात विस्तार होताना दिसून येत आहे.

किनवट तालुक्यातील महिलांच्या प्रश्नासाठी मी सतत काम करत आले.

माझ्या या कार्याचे फलित म्हणून महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक रवी वैद्य, महिला प्रदेशाध्यक्ष विजया बावदाने,

 जिल्हाध्यक्ष शेख शकील महोमद युसूफ, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पद्मा गिर्हे  यांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली ती जबाबदारी पार पडण्यास मी कटिबद्ध राहील

 या असोसिएशन माध्यमातून किनवट तालुक्यातील  अन्याय  अत्याचारग्रस्त महिलांना निश्चितपणे न्याय मिळून देण्याचे काम करू 

अशी प्रतिक्रिया परवीन शेख यांनी नियुक्तीनंतर दिली आहे.

या नियुक्तीबद्दल पोलिस कर्मचाऱ्यांसह

कॉंग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष सुरेखा काळे, मनसेचे मा.तालुकाध्यक्ष नितीन मौहरे.

 इलेक्ट्रॉनिक मीडियाचे तालुकाध्यक्ष आनंद भालेराव, नासिर तगाले , राजेश पाटील,सुहास मुंडे, प्रवीण कोवे, गंगाधर कदम, अरविंद सूर्यवंशी , शेख अतीफ यांनी  परवीन शेख यांचे अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...