Skip to main content

स्वराज्य युवा प्रतिष्ठान गोकुंदा तर्फे शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त स्पर्धा परीक्ष संपन्न.....300 विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग...



किनवट: (तालुका प्रतिनिधी) 

       छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त स्वराज्य युवा प्रतिष्ठान गोकुंदा तर्फे 9 ते 12 च्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन 14 फेब्रुवारी रोजी एन. के टावर, गोकुंदा येथे करण्यात आले असून यामध्ये जवळपास 300 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

     छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने तरुणांमध्ये स्पर्धा परीक्षा व शिवरायांचे विचार पोहोचवण्याचे काम स्वराज्य युवा प्रतिष्ठान यांनी केले आहे. परिक्षेच्या सुरुवातीला शिवरायांच्या पुतळ्याचे पुष्पहाराने पूजन करून ठिक 2 वर्षाआधी पुलवामा येथे शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली देण्यात आली व शिवरायांच्या घोषणा देवुन स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. 

        या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्वराज्य युवा प्रतिष्ठान गोकुंदा व स्पर्धा परीक्षेचे आयोजक ईलीयाज मोहम्मद, नागेश राव, अभिषेक बामणे, गजानन सूर्यवंशी, अजिज शेख, अरविंद डाखोरे, शेख सुलतान, अजय इटकेपेल्लीवार, जावेद शेख, अरबाज शेख यांनी परिश्रम घेतले तर जाकिर सर, बाळकृष्ण कदम, अमन सर, अजिंक्य जाधव, ज्ञानेश्वर कदम, तथागत गायकवाड, विक्रम वाघमारे यांनी मार्गदर्शन केले.

        या स्पर्धेा परिक्षेचे बक्षीस वितरण दिनांक 19 फेब्रुवारी रोजी अपना हॉटेल, गोकुंदा येथे दुपारी 2 वाजता होणार आहे. शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या या स्पर्धेत मुलां-मुलींनी उस्फुर्त प्रतिसाद दिल्याने सर्वच स्तरातून स्वराज्य प्रतिष्ठान व कार्यक्रमाचे तरुण आयोजकांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...