Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची नांदेड जिल्हा कार्यकारिणी जाहिर किनवट तालुकाध्यक्षपदी आनंद भालेराव



नांदेड  प्रतिनिधी:

: प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची नांदेड जिल्हा कार्यकारिणी दि.२० जानेवारी २०२१ रोजी जाहिर करण्यात आली. या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पत्रकारांवर कदापिही खोटे गुन्हे दाखल होऊ देणार नसल्याचे भाष्य केले तसेच संघाचे संपादक व पत्रकारांचे कुटुंब यांचे कल्याणासाठी विविध योजना राबवून सक्षम पत्रकार ही संकल्पना संघाने हाती घेतल्याचे सांगितले. यावेळी नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष विशाल पवार, जिल्हा संघटक शंकरसिंह ठाकूर, जिल्हा संपर्क प्रमुख मारोती शिकारे, जिल्हा समन्वयक संदीप कांबळे, जिल्हा महिलाध्यक्षा विजया सोनटक्के, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, मराठवाडा संपर्क प्रमुख सुर्यकांत तादलापूरकर, मराठवाडा महिलाध्यक्षा वैशाली हिंगोले, यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड, देगलूर तालुकाध्यक्ष मिलींद कावळगावकर, मुखेड तालुकाध्यक्ष भारत सोनकांबळे, कार्याध्यक्ष असद बल्खी, नायगाव तालुकाध्यक्ष अविनाश अतेराये, बिलोली तालुकाध्यक्ष बलीमोद्दीन फारूकी, भोकर तालुकाध्यक्ष दत्ता बोईनवाड, किनवट तालुकाध्यक्ष आनंद भालेराव, हदगाव तालुकाध्यक्ष संदीप तुपकरी, उमरी तालुकाध्यक्ष उध्दव मामडे, लोहा तालुकाध्यक्ष शिवराज पवार, कंधार तालुकाध्यक्ष नितीन कोकाटे, मुखेड तालुका सचिव मोतीपाशा पाळेकर, नांदेड शहराध्यक्ष हरजिंदरसिंघ संधू, महिला शहराध्यक्षा विद्या वाघमारे, नांदेड तालुका सदस्या मीना नारळे आदी पदाधिका-यांना संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड, मुखेड तालुकाध्यक्ष भारत सोनकांबळे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या उल्लेखनिय कार्याची माहिती दिली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांनी केले तर आभार जिल्हा कार्याध्यक्ष विशाल पवार यांनी मानले यावेळी संघाचे पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला