Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची नांदेड जिल्हा कार्यकारिणी जाहिर किनवट तालुकाध्यक्षपदी आनंद भालेराव



नांदेड  प्रतिनिधी:

: प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची नांदेड जिल्हा कार्यकारिणी दि.२० जानेवारी २०२१ रोजी जाहिर करण्यात आली. या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पत्रकारांवर कदापिही खोटे गुन्हे दाखल होऊ देणार नसल्याचे भाष्य केले तसेच संघाचे संपादक व पत्रकारांचे कुटुंब यांचे कल्याणासाठी विविध योजना राबवून सक्षम पत्रकार ही संकल्पना संघाने हाती घेतल्याचे सांगितले. यावेळी नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष विशाल पवार, जिल्हा संघटक शंकरसिंह ठाकूर, जिल्हा संपर्क प्रमुख मारोती शिकारे, जिल्हा समन्वयक संदीप कांबळे, जिल्हा महिलाध्यक्षा विजया सोनटक्के, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, मराठवाडा संपर्क प्रमुख सुर्यकांत तादलापूरकर, मराठवाडा महिलाध्यक्षा वैशाली हिंगोले, यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड, देगलूर तालुकाध्यक्ष मिलींद कावळगावकर, मुखेड तालुकाध्यक्ष भारत सोनकांबळे, कार्याध्यक्ष असद बल्खी, नायगाव तालुकाध्यक्ष अविनाश अतेराये, बिलोली तालुकाध्यक्ष बलीमोद्दीन फारूकी, भोकर तालुकाध्यक्ष दत्ता बोईनवाड, किनवट तालुकाध्यक्ष आनंद भालेराव, हदगाव तालुकाध्यक्ष संदीप तुपकरी, उमरी तालुकाध्यक्ष उध्दव मामडे, लोहा तालुकाध्यक्ष शिवराज पवार, कंधार तालुकाध्यक्ष नितीन कोकाटे, मुखेड तालुका सचिव मोतीपाशा पाळेकर, नांदेड शहराध्यक्ष हरजिंदरसिंघ संधू, महिला शहराध्यक्षा विद्या वाघमारे, नांदेड तालुका सदस्या मीना नारळे आदी पदाधिका-यांना संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड, मुखेड तालुकाध्यक्ष भारत सोनकांबळे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या उल्लेखनिय कार्याची माहिती दिली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांनी केले तर आभार जिल्हा कार्याध्यक्ष विशाल पवार यांनी मानले यावेळी संघाचे पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...