Skip to main content

स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा किनवटच्या कार्यालयात शेतकऱ्याचे ठिय्या आंदोलन

 

ता. प्र . किनवट :

कोरोना महामारी व नापिकीमुळे डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिकच भर पडली असताना स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा किनवट कडून शेतकऱ्यांस पीककर्ज देण्यास टाळाटाळ करत आहे अशी अनेक शेतकऱ्यांची तक्रार लक्षात घेऊन किनवट येथील सामाजिक कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष अरुण आळणे यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कीनवट च्या कार्यालयात घुसून शेतकऱ्यासह ठिय्या आंदोलन केले.

या बँकेत शेतकऱ्यांची पिक कर्ज देण्यासाठी दलाला ची मदत घ्यावी लागते. अन्यथा पीक कर्जे मंजूर केल्या जात नाहीत असा घणाघाती आरोप शेतकऱ्यांनी केला. तसेच या बँकेतील कर्मचारी शेतकऱ्याशी आडमुठीची भाषा वापरतात व काही अडचणी विचारल्यास कोनोही बोलायला तयार नाहीत असा आरोप करत ठिय्या आंदोलन करण्यात आले .


शेवटी येथील बँक मॅनेजरने येत्या पंधरा दिवसात राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांचे पीक कर्ज देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर तुर्तास ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले.

यावेळेस लाभार्थी शेतकरी व निखिल वाघमारे , सुरेश मुनेश्वर , सिध्दार्थ वाघमारे , प्रवीण गायकवाड ,सुधाकर हलवले ,विजय पाटील, संदीप योगेश राठोड व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते होते .

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...