ता. प्र . किनवट :
कोरोना महामारी व नापिकीमुळे डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिकच भर पडली असताना स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा किनवट कडून शेतकऱ्यांस पीककर्ज देण्यास टाळाटाळ करत आहे अशी अनेक शेतकऱ्यांची तक्रार लक्षात घेऊन किनवट येथील सामाजिक कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष अरुण आळणे यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कीनवट च्या कार्यालयात घुसून शेतकऱ्यासह ठिय्या आंदोलन केले.
या बँकेत शेतकऱ्यांची पिक कर्ज देण्यासाठी दलाला ची मदत घ्यावी लागते. अन्यथा पीक कर्जे मंजूर केल्या जात नाहीत असा घणाघाती आरोप शेतकऱ्यांनी केला. तसेच या बँकेतील कर्मचारी शेतकऱ्याशी आडमुठीची भाषा वापरतात व काही अडचणी विचारल्यास कोनोही बोलायला तयार नाहीत असा आरोप करत ठिय्या आंदोलन करण्यात आले .
शेवटी येथील बँक मॅनेजरने येत्या पंधरा दिवसात राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांचे पीक कर्ज देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर तुर्तास ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळेस लाभार्थी शेतकरी व निखिल वाघमारे , सुरेश मुनेश्वर , सिध्दार्थ वाघमारे , प्रवीण गायकवाड ,सुधाकर हलवले ,विजय पाटील, संदीप योगेश राठोड व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते होते .
Comments
Post a Comment