Skip to main content

भुमीहीन बेघरासाठी असलेल्या नगर परिषदेच्या आरक्षीत भुखंड जागेवर भुमाफियांचे अतिक्रमण

 


(ता . प्र . किनवट/ सुरज भरणे)

किनवट नगरपरिषद हद्दीमधील सर्वे क्रमांक 253/1 व 254/1हे क्षेत्र महाराष्ट्र शासन भूमिहीन  बेघराकरिता राखीव असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल व दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठी या राखीव भूखंडाचे वाटप करून दिलासा द्यावा अशा आशयाचे निवेदन नगरसेविका राहत तबसून काझी,सुनयना  विशाल जाधव जिल्हा परिषद सदस्य तथा समाज कल्याण समिती सदस्य, भाजपचे  अल्पसंख्याक प्रदेश सचिव गुरूप्रीत सिंग  यांच्यासह असंख्य बेघर नागरिकांनी नगर परिषदेचे अध्यक्ष तसेच मुख्य अधिकारी यांना दिले आहे.

किनवट नगरपरिषद हद्दीत समता नगरला लागून 253/1व 254/1 या शेत सर्वे क्रमांकांची जागा महाराष्ट्र शासन भूमिहीन घराकरिता राखीव असून  सन 1980 पासून ही जागा बेघरासाठी आरक्षित असतानासुद्धा अद्यापही महाराष्ट्र शासनाने अथवा नगर पालिका प्रशासनाने या भूखंडावर बेघरांना जागा उपलब्ध करून दिली नाही.

हक्काच्या जागेअभावी समता नगर, सुभाष नगर, गंगानगर,  धोबीगल्ली येथील गोरगरीब कुटुंबे किरायाच्या खोलीमध्ये वास्तव्य करून आहेत.विशेष म्हणजे शासनाकडून किनवट नगरपरिषद हद्दीतील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना पंतप्रधान घरकुल आवास योजना तसेच रमाई घरकुल आवास योजनेतून घरकुले मंजूर झालेली आहेत परंतु लाभार्थ्याना त्यांच्या मालकीची जागा उपलब्ध नसल्यामुळे ते केवळ जागेअभावी हक्काच्या निवासापासून  वंचित आहेत.

विशेष म्हणजे या मोकळ्या भूखंडावर डोळा ठेवून काही भूखंड माफिया शासनाच्या या राखीव जागेवर व गोरगरीबांच्या हक्काच्या जागेवर विनापरवाना राजकीय आश्रय घेऊन अतिक्रमण करत असून अनेकांनी या ठिकाणी जागा हडप करून बेकायदेशीररित्या बांधकाम सुद्धा सुरु केले आहे. शासनाच्या जागेवर अशाप्रकारे बेकायदेशीर अतिक्रमण करून कोणी शासनाचा भूखंड हडप करण्याचा प्रयत्न करत असेल  आणि या जागेवर अन्य वस्ती बेकायदेशीररित्या स्थलांतरित करण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा भूखंडमाफियावर नगरपालिका प्रशासनासह जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष घालून कारवाई करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.




किनवट शहरातील बेघर कुटुंबाची संख्या लक्षात घेऊन तसेच घरकुल लाभार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने शेत सर्वे क्रमांक 253/1 व 254/1 या क्षेत्रातील महाराष्ट्र शासनाची राखीव जागा तात्काळ बेघर कुटुंबांना घरकुलांसाठी उपलब्ध करून द्यावी अन्यथा प्रहार संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशा असा इशारा सुद्धा निवेदनातून दिला आहे. निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य सूनयना विशाल जाधव सदस्या समाजकल्याण समिती जिल्हा परिषद नांदेड,नगरसेविका राहातबसून काझी

 यांच्यासह बेघर  अंजूताई शंकर येरेकार, 

अंकुश बाबू भालेराव, 

राहुल गौतम कापसे, 

चतुरंग अंबादास कांबळे ,

मोहम्मद पाशा वली साहब,

 राहुल गिमेकार, 

शेख फकीर शेख खाजा, 

शेख शब्बीर शेख शरीफ, 

सम्राट  कावळे,

 विजय जोशी,

 महेंद्र  वासाटे, 

शेख महंमद शेख महेबुब, 

अविनाश  नगराळे, 

आरिफ खान समीउल्ला खान, 

शेख हसन शेख सत्तार,

यास्मिन खानम रियाज पठाण, 

मोहम्मद युनुस मोहम्मद युसुफ, 

रशिद बैलिम, 

अक्रम दाऊद चव्हाण 

आदम चव्हाण 

गोपीकिशन आत्राम, 

मोहम्मद अली, 

शेख अक्रम शेख महेबुब, 

मयूर  महाबळे

यांच्या स्वाक्षर्‍या आहेत



Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...