उपोषणाची दखल घेऊन गट विकास अधिकारी प.स. किनवट यांनी१५ दिवसात प्र.आ.यो. संबंधी चौकशीचे करण्याचे व दोषीवर कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे
(बातमीदार: कोठारी (सि.) इंद्रपाल कांबळे)
किनवट तालुक्यातील ग्रा.प. कोठारी (सिं) येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लाभार्थींचे पक्के घर असल्याचा खोटा ठराव देवुन खऱ्या लाभर्थ्यावर अन्याय होत असल्याने त्यांनी दि.२५ रोजी उपोषणाचा मार्ग पत्करला आहे आमच्या प्रतिनिधींनी वंचीत असलेल्या लाभार्थ्याशीं संवाद साधला असता १ ते५ प्रमाणे२०२०-२१ च्या जि. ओ. टाँकींग क्रमवारीनुसार ५६ नंतर ९१,९४,११०,१२१,१२८,१६०,१६१,१६४, व१८३ मध्ये लाभ मिळाला परंतु ५६ नंतर१८३ आतील सुटलेल्यानां लाभ का मिळाला नाही उलट काहींनी शेतात खरे बांधली या मध्ये ग्रा.से., अभियताचे साटलोट तर नाही ना तेव्हां या घटनेची सखोल चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे या अमरण उपोषणास १) सुभाष उद्धव आडे, २)तुकाराम हिरासिंग राठोड,३) मनोज मधुकर राठोड,४) उमेश जोगराम चव्हाण५) दत्ता भिक्कु राठोड,६) संजय बापुराव पवार व गावातील ग्रामस्थ बसले आहे
या उपोषणाची दखल घेत गट विकास अधिकारी पंचायत समिती यांनी या सदरील विषायान्वे सखोल चौकशी करून पंधरा दिवसात अहवाल सादर करण्यात येईल व दोषी विरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले आहे
Comments
Post a Comment