Skip to main content

डुकरांनी तोडले मानवी मृतदेहाचे लचके नांदेडच्या शासकीय रुग्णालया समोरील मन खिन्न करणारी घटना


नांदेड डुकरांनी तोडले मानवी मृतदेहाचे लचके


नांदेडच्या शासकीय रुग्णालया समोरील मन खिन्न करणारी घटना प्रतिनिधी :

 डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरीच्या प्रवेशद्वारा जवळ असलेल्या कचराकुंडीच्या बाजूला एका मानवी मृतदेहाचे लचके डुक्करांनी तोडल्याचा लाजिरवाणी आणी संतापजनक प्रकार घडला आहे. सदरील घटनेचा जिल्हाधिकाऱ्यांनी तपास करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालयातील आणि वैद्यकीय रुग्णालयातील अनेक संतापजनक प्रकार यापूर्वीही पुढे आले आहेत .रुग्णालय प्रशासना कडून होत असलेल्या बेजबाबदारपणाने आता कळस गाठला आहे. रुग्णांवर उपचारासाठी करण्यात येणारी टाळाटाळ ,रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अपमानास्पद वागणूक यासह अनेक बाबींनी कळस गाठला आहे. आता त्यात मोठी भर पडली असून शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या कचराकुंडी लगत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पडला होता . दोन ते तीन दिवसांपूर्वी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सदरील मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. बुधवार दिनांक 20 जानेवारी 2021 रोजी सकाळी डुकराची झुंड त्या मृतदेहाचे लचके तोडत असल्याचे रुग्णालयातील नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी डुकरांना हकालण्याचा प्रयत्न केला. परंतु डुकरांनी त्या मृतदेहाच्या अर्ध्या शरीराचे लचके तोडल्याचे दिसून आले, त्यामुळे कुजलेल्या अवस्थेत असलेल्या मानवी मृतदेहाचे लचके तोडणाऱ्या या घटनेचा सर्वच क्षेत्रातून निषेध केला जात असून रुग्णालय प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.


Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...