Skip to main content

किनवट शहरात गाढवांचा हैदोस प्रशासनाचे दुर्लक्ष

 (ता . प्र. किनवट)

किनवट शहरात गाढव राज सुरू झाले असून शहरात जिकडे तिकडे गाढवेच गाढवे दिसून येतात. तसेच या शहरात कुत्रे, डुक्करे, शेळ्या, गाई,म्हशी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दिसून येतात. त्यामुळे माणसे कमी प्राणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच डुकरांची मस्ती, गाढवांची मस्ती, रस्त्यावर दिसून येत आहे त्यामुळे शहरात अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. किनवट येथील धडाडीचे पत्रकार लोकादेश चे संपादक साजिद बडगुजर यांचा अपघात गाढवा मुळेच झाला. त्यांना आपला एक पाय गमवावा लागला. पाय फॅक्चर झाल्यामुळे त्यांना यवतमाळ येथे हलवावे लागले त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर( चांगली )आहे.

परंतु असे अनेक अपघात आतापर्यंत झाले आहेत. व ते होतच असतात याचे काही प्रशासनास देणे घेणे नाही. त्याकडे नगरपालिका प्रशासन ढुंकूनही पाहत नाही किंवा त्यावर कोणतीही उपाययोजना ही करीत नाही हे असेच चालू आहे यावर जनतेनेच विचार करायला हवा.

किनवट ला लागूनच पैनगंगा नदी आहे. अनेक वर्षापासून नदीतील रेती घाटांचा लिलाव झालेला नसल्यामुळे ट्रॅक्टरने रेती बंद झाली आहे त्यामुळे रेती टाकण्यासाठी गाढवांचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जात आहे. परंतु त्या गाढवांची चाऱ्याची सोय त्यांच्या मालकाकडून होत नाही. काम करून घेऊन गाढवे रिकामी रस्त्यावर सोडली जात आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहेत.यावर आळा घालण्यासाठी ची उपाय योजना आखने गरजेचे आहे. नुसता रोज एक अपघात झाल्याशिवाय राहणार नाही.



Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.