(ता . प्र. किनवट)
किनवट शहरात गाढव राज सुरू झाले असून शहरात जिकडे तिकडे गाढवेच गाढवे दिसून येतात. तसेच या शहरात कुत्रे, डुक्करे, शेळ्या, गाई,म्हशी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दिसून येतात. त्यामुळे माणसे कमी प्राणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच डुकरांची मस्ती, गाढवांची मस्ती, रस्त्यावर दिसून येत आहे त्यामुळे शहरात अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. किनवट येथील धडाडीचे पत्रकार लोकादेश चे संपादक साजिद बडगुजर यांचा अपघात गाढवा मुळेच झाला. त्यांना आपला एक पाय गमवावा लागला. पाय फॅक्चर झाल्यामुळे त्यांना यवतमाळ येथे हलवावे लागले त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर( चांगली )आहे.
परंतु असे अनेक अपघात आतापर्यंत झाले आहेत. व ते होतच असतात याचे काही प्रशासनास देणे घेणे नाही. त्याकडे नगरपालिका प्रशासन ढुंकूनही पाहत नाही किंवा त्यावर कोणतीही उपाययोजना ही करीत नाही हे असेच चालू आहे यावर जनतेनेच विचार करायला हवा.
किनवट ला लागूनच पैनगंगा नदी आहे. अनेक वर्षापासून नदीतील रेती घाटांचा लिलाव झालेला नसल्यामुळे ट्रॅक्टरने रेती बंद झाली आहे त्यामुळे रेती टाकण्यासाठी गाढवांचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जात आहे. परंतु त्या गाढवांची चाऱ्याची सोय त्यांच्या मालकाकडून होत नाही. काम करून घेऊन गाढवे रिकामी रस्त्यावर सोडली जात आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहेत.यावर आळा घालण्यासाठी ची उपाय योजना आखने गरजेचे आहे. नुसता रोज एक अपघात झाल्याशिवाय राहणार नाही.
Comments
Post a Comment