Skip to main content

“ महाविहार बावरी नगर नांदेड येथे ऑनलाइन धम्म परिषदेचे आयोजन"


(नांदेड प्रतिनिधी आम्रपाली शेळकीकर):

 सन १९८८  पासून  महाविहार, बावरीनगर, दाभड नांदेड येथे दरवर्षी दोन दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे अविरतपणे आयोजन करण्यात येते. देश विदेशातून पाचारण केलेल्या विद्वान भिक्खूंकडून धम्मदेसना घेण्यासाठी लाखोंच्या संख्येत लोक येथे  येत असतात. कोव्हिड-१९ विषाणूच्या सर्वदूर झालेल्या  प्रादुर्भावामुळे तथा शासनाच्या निर्देशांमुळे, यावर्षी आयोजित होणारी ३४ वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद दूरदृष्य (ऑनलाइन) प्रणाली  द्वारे आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे.  

 महाराष्ट्रातच नव्हे तर सबंध देशभरात नावलौकिक असलेले तथा शासनाचा तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त  असलेले हे ठिकाण बुद्ध कालीन धम्मानुयायी बावरी ब्राह्मणाच्या स्मरणार्थ “बावरीनगर” म्हणून संबोधिल्या जाते. प्रतिवर्षी प्रमाणे महाविहार बावरीनगर दाभड नांदेड येथे याही वर्षी दि. २८ व २९ जानेवारी २०२१  रोजी दोन दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयिजित करण्यात आलेली आहे.  भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था मुळावा चे अध्यक्ष पू. भदंत धम्मसेवक महास्थवीर यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद संपन्न  होणार आहे.


 या दोन दिवासीय दूरदृष्य (ऑनलाइन) प्रणाली  द्वारे आयोजित धम्म परिषदेत भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो, भिक्खु डॉ. एम. सत्यपाल थेरो, भिक्खु विणय बोधिप्रिय थेरो, भिक्खू पय्यारत्न थेरो, भिक्खु हर्षबोधी थेरो, भिक्खु करुणानंद थेरो, भिक्खु ज्ञानरक्षित- औरंगाबाद, भिक्खु संघपाल इत्यादी देश विदेशातील विद्वान भिक्खुंची धम्म देसणा होईल. 

आवाहन:

कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर आयोजित होणा-या ३४ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेत कोणत्याही प्रकारची  दुकाने थाटण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. कोव्हिड -१९ या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये अगर त्याचा प्रसार होऊ नये व अशा संकट समयी स्वत:च्या आरोग्यचीही काळजी घेणे आवश्यक असल्याने सर्व उपासक उपसिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी महाविहार बावरीनगर येथे धम्म परिषदेकरीता प्रत्यक्ष न येता आपल्या निवासस्थानाहुनच सोशल मिडियावर दूरदृश्य (ऑनलाईन) प्रणालीद्वारे धम्मदेसनेचा लाभ घ्यावा,  असे आवाहन धम्म परिषदेचे संयोजक महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला