Skip to main content

स्वारातिम विद्यापीठ नांदेड व बळीराम पाटील महाविद्यालय किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ऑनलाईन कार्यक्रम



(किनवट शहर प्रतिनिधी)

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड भाषा, वाङमय व संस्कृती अभ्यास संकुल आणि बळीराम पाटील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,किनवट मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे. या वेबिनारचे

आदिवासी साहित्याचे अभ्यासक, भाषा, वाङमय व संस्कृती अभ्यास संकुलचे प्रा. डॉ. वैजनाथ अनमुलवाड हे उदघाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत.दलित साहित्याचे अभ्यासक व विद्रोही कवी ,मराठी भाषेचे अभ्यासक प्रा. डॉ. आनंद इंजेगावकर हे मराठी भाषा संवर्धन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ. एस. के. बेंबरेकर राहणार आहेत.कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत गीत प्राचार्य सुरेश पाटील सादर करतील. 

मराठी भाषा संवर्धन काळाची गरज या विषयावर प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. अनिल कांबळे,महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर, मराठी भाषेचा सार्वत्रिक वापरःवस्तुस्थिती व भवितव्य या विषयावर प्रसिद्ध विचारवंत, कथाकार, वैचारिक लेखक प्रा. डॉ. शंकर विभूते,इंदिरागांधी महाविद्यालय, नांदेड हे मार्गदर्शन करणार आहेत.मराठी भाषेचे भवितव्य व संवर्धन या विषयाच्या अनुषंगाने प्रा. डॉ. संतोष हंकारे, पारंपारिक तमाशा:कला आणि वास्तवजीवन बोलीभाषा संदर्भात मराठी विभागाच्या मुंबई विद्यापीठ, मुंबई येथील शामल गरुड यांचे व्याख्यान होणार आहे. समारोप कार्यक्रमात मराठी भाषा व संवर्धन व बोलीचे संवर्धन या विषयावर प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. रवींद्र बेंबरे हे मार्गदर्शन करणार आहेत. या वेबिनाराचे सत्रनिहाय सत्र अध्यक्ष म्हणून सत्यशोधकीय विचारवंत प्रा. रामप्रसाद तौर, प्रसिद्ध नाटककार व नाट्य लेखक प्रा. डॉ.अंबादास कांबळे, सत्यशोधकीय अभ्यासक प्रा. डॉ. उमाकांत इंगोले,प्रा.डाॅ.सुरेंद्र शिंदे उपस्थित राहणार आहेत. या वेबिनारमध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. राजकुमार नेम्मानीवार, पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती आहे. या अभ्यासपूर्वक वेबिनारमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड.संचालक,भाषा,वाङमय व संस्कृती अभ्यास संकुलच्या डॉ. शैलजा वाडीकर, बळीराम पाटील महाविद्यालय, किनवट येथील मराठी विभागप्रमुख तथा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा समन्वयक प्रा. डॉ. पंजाब शेरे यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला