Skip to main content

घोटी येथे राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची संयुक्त जयंती विविध उपक्रमांनीसाजरी


किनवट / घोटी(तालुका प्रतिनिधी)

किनवट शहरापासून जवळच असलेल्या मौजे घोटी या शांतताप्रिय गावांमध्ये सर्वधर्म समभाव या भावनेतून घोटी गावकऱ्यांच्या सहकार्याने किंबहुना आशीर्वादाने राजू पाटील सुरोशे यांच्या नेतृत्वात राष्ट्रमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांची जयंती मान्यवरांच्या साक्षीने व घोटी गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात साजरी करण्यात आली म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ चे विचार आत्मसात करता येतात म्हणजे त्यांचे विचार जीवनात आणल्यास उच्च दर्जाचे जीवन जगता येते हे मान्यवराच्या मार्फत प्रबोधनकार अतुल बळेकर यांनी सांगितले तसेच प्राध्यापक पंजाब शेरे  सर यांनी आपल्या प्रबोधनातून राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्रावर व शिक्षण आणि संस्कार याविषयी त्यांनी उच्च दर्जाचे मार्गदर्शन केले. राजू पाटील सुरोशे हे गावातील एक युवा नेतृत्व आहे ते गेल्या दहा ते बारा वर्षापासून गावकऱ्यांसाठी काम करतात म्हणजेच ते सतत सेवा वृत्तीतून आपले जीवन समर्पित करत  आलेले आहेत. त्यांच्या जीवनात 80 टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण आहे हे त्यांच्या जीवनाच्या यशाची गुरुकिल्ली आहे. त्यांना सर्व गावकऱ्यांचा आशीर्वाद आहे ते गावकरी मंडळी च्या सहकार्याने त्यांनी अनेक सामाजिक काम केले आहेत. या नेतृत्वाला योग्य त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा किनवट तालुक्यातील बहुतांश जनसामान्यांची आहे. म्हणूनच की काय त्यांच्या हातून असे पवित्र काम पार पडत असते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावातील ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील प्रतिष्ठित नागरिक आनंदराव सुरोशे पाटील, तर प्रमुख उपस्थिती प्रबोधनकार अतुल बळेकर, प्राध्यापक पंजाब शेरे सर, अशोक कोसले, वामन वाडई,  राम गरड, अशोक सुरोशे,,जगदीश गरड पाटील, सोमा पाटील, कार्यक्रमाचे आयोजक राजू सुरोशे पाटील, अभिजीत गरड पाटील, पद्माकर भवरे ,संतोष मिरासे ,कविराज भवरे, चंद्रशेखर गरड पाटील, भीमराव पाटील, घोटी गावचे पोलीस पाटील प्रविण माथुरे,  प्रकाश गरड,पांडुरंग खरे, अनिल मुनेश्वर, गजानन गरड, पप्पू गरड, वैभव गरड ,अनिकेत सुरोशे, निकेतन सुरोशे, गौरव सुरोशे, ज्ञानू बोंडारकर, ओम कदम, चैतन्य कदम ,आकाश पवार, विकास पवार, आदीसह गावातील व परिसरातील बहुतांश प्रतिष्ठित महिला, शेतकरी, कर्मचारी, विद्यार्थी ,उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला