Skip to main content

पिक कर्ज वेळेवर मिळत नसल्याने किनवटचे माजी नगराध्यक्ष अरुण आळणे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांसाठी बँकेतच फास घेण्याचा प्रयत्न मांडवी (एस बी आय बँकेतील प्रकार )बँक प्रशासन हादरले



 (मांडवी प्रतिनिधी-इंद्रपाल कांबळे)

 आज मांडवी येथील स्टेट बँकेत शेतकरी अरुण आळणे यांनी पीक कर्ज वेळेवर का देत नाही म्हणून फाशी घेण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली

 याबाबतचे सविस्तर वृत्त असे की मागील पाच ते सहा महिन्यापासून  शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची फाईला अनेक दिवसांपासून प्रलंबित असून अनेक वेळा बँकेला विचारणा केली असता सविस्तर माहिती काही मिळत नसल्यामुळे आज शेवटी वैतागून शेतकऱ्यांसाठी अरूण आळणे यांनी बँकेच्या फील्ड ऑफिसर यांच्या टेबलावरती असलेल्या पंख्याला गळफास घेण्याचा प्रयत्न केला.

या वेळी उपस्थित पोलिस उपनिरीक्षक शिवप्रसाद कराळे व विजय कोळी, बँकेचे सुरक्षा रक्षक यांनी त्याना उतरविण्याचा प्रयत्न केल्याने पुढील अनर्थ टळला या अचानक घडलेल्या प्रकारामुळे बँक चे बाहेर उपस्थित शेतकरी व बँक कर्मचारी हे आवक झाले.

 सायंकाळी चार वाजता पर्यंत बँकेच्या बाहेर अनेक शेतकरी उभ्या असतानाही अधिकारी हे नेट नाही या कारणास्तव एकही अर्ज पास होत नाही असे कारण सागत होते 


 मागील अनेक महिन्यांपासून पीक कर्ज चे अर्ज हे बँकेत देत आहे त्यापैकी करुणा आरून आळणे यांच्या फाईलीवर सही पण झालेली आहे  या बँकेत अरुण आळणे यांच्यासह अनेक शेतकन्यांच्या  पीक कर्जाच्या  फाईली देऊन आहेत  अनेक वेळा भेट दिली असता बँकेतून सविस्तर माहिती मिळत नाही हे लोक व्यवस्थित बोलत पण नाही नेट नाही हे कारण देऊन बाजूला बसतात बँकेच्या कमासाठी शेतकरी येथे रोज ये-जा करत असतात त्यांच्या कामे बुडतात पण बँकेच्या कर्मचारी माहिती सुद्धा देत नाही यामुळे या कर्मचाऱ्यांना कर्तव्याची जाणीव व्हावी व शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळावे यासाठी फाशी घेतल्या शिवाय पर्याय नाही त्यामुळे मला असे करावे लागत आहे

 किनवटचे माजी नगराध्यक्ष व शेतकरी यांनी सांगितले.

 


 "मांडवी चे बँकेचे फिल्ड ऑफिसर यांनी असे सांगितले की मांडवी स्टेट बँकेला इंटरनेट कनेक्टिव्हिटी बीएसएनएल यांचे असून ती सतत बंद असते त्यामुळे बँकेच्या नाईलाज आहे आतापर्यंत दोनशे शेतकऱ्यांचे पीक कर्ज हे प्रलंबित असून येत्या पंधरा दिवसात सर्व शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात येईल एकही शेतकरी कर्ज पासून वंचित राहणार नाही असे त्यांनी सांगितले आहे"

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...