Skip to main content

पिक कर्ज वेळेवर मिळत नसल्याने किनवटचे माजी नगराध्यक्ष अरुण आळणे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांसाठी बँकेतच फास घेण्याचा प्रयत्न मांडवी (एस बी आय बँकेतील प्रकार )बँक प्रशासन हादरले



 (मांडवी प्रतिनिधी-इंद्रपाल कांबळे)

 आज मांडवी येथील स्टेट बँकेत शेतकरी अरुण आळणे यांनी पीक कर्ज वेळेवर का देत नाही म्हणून फाशी घेण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली

 याबाबतचे सविस्तर वृत्त असे की मागील पाच ते सहा महिन्यापासून  शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची फाईला अनेक दिवसांपासून प्रलंबित असून अनेक वेळा बँकेला विचारणा केली असता सविस्तर माहिती काही मिळत नसल्यामुळे आज शेवटी वैतागून शेतकऱ्यांसाठी अरूण आळणे यांनी बँकेच्या फील्ड ऑफिसर यांच्या टेबलावरती असलेल्या पंख्याला गळफास घेण्याचा प्रयत्न केला.

या वेळी उपस्थित पोलिस उपनिरीक्षक शिवप्रसाद कराळे व विजय कोळी, बँकेचे सुरक्षा रक्षक यांनी त्याना उतरविण्याचा प्रयत्न केल्याने पुढील अनर्थ टळला या अचानक घडलेल्या प्रकारामुळे बँक चे बाहेर उपस्थित शेतकरी व बँक कर्मचारी हे आवक झाले.

 सायंकाळी चार वाजता पर्यंत बँकेच्या बाहेर अनेक शेतकरी उभ्या असतानाही अधिकारी हे नेट नाही या कारणास्तव एकही अर्ज पास होत नाही असे कारण सागत होते 


 मागील अनेक महिन्यांपासून पीक कर्ज चे अर्ज हे बँकेत देत आहे त्यापैकी करुणा आरून आळणे यांच्या फाईलीवर सही पण झालेली आहे  या बँकेत अरुण आळणे यांच्यासह अनेक शेतकन्यांच्या  पीक कर्जाच्या  फाईली देऊन आहेत  अनेक वेळा भेट दिली असता बँकेतून सविस्तर माहिती मिळत नाही हे लोक व्यवस्थित बोलत पण नाही नेट नाही हे कारण देऊन बाजूला बसतात बँकेच्या कमासाठी शेतकरी येथे रोज ये-जा करत असतात त्यांच्या कामे बुडतात पण बँकेच्या कर्मचारी माहिती सुद्धा देत नाही यामुळे या कर्मचाऱ्यांना कर्तव्याची जाणीव व्हावी व शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळावे यासाठी फाशी घेतल्या शिवाय पर्याय नाही त्यामुळे मला असे करावे लागत आहे

 किनवटचे माजी नगराध्यक्ष व शेतकरी यांनी सांगितले.

 


 "मांडवी चे बँकेचे फिल्ड ऑफिसर यांनी असे सांगितले की मांडवी स्टेट बँकेला इंटरनेट कनेक्टिव्हिटी बीएसएनएल यांचे असून ती सतत बंद असते त्यामुळे बँकेच्या नाईलाज आहे आतापर्यंत दोनशे शेतकऱ्यांचे पीक कर्ज हे प्रलंबित असून येत्या पंधरा दिवसात सर्व शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात येईल एकही शेतकरी कर्ज पासून वंचित राहणार नाही असे त्यांनी सांगितले आहे"

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.