किनवट:येथील अजय मारोती पाटील हे यू.जी.सी मार्फत घेण्यात आलेल्या मराठी विषयात अधिव्याख्याता या पदासाठी उत्तिर्ण झाले आहे,याआधी सुद्धा ते इतिहास या विषया मध्ये नेट उत्तिर्ण झाले होते.त्यांच्या या यशाबद्दल डॉ अशोक गीणगिने,डॉ किरण पाईकराव,डॉ राजु मोतेराव,प्रा प्रदीप ऐडके,प्रा किशन मिरासे,प्रा शिवदास बोकडे,प्रा कपील पाटील,राजा तामगाडगे,रमेश पडगिलवार , पत्रकार राजेश पाटील, संजय नरवाडे, विशाल गिमेकार, आदिनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण
Comments
Post a Comment