( मुंबई वृतसेवा ):
महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले संपूर्ण जीवन वेचले आहे. देशातील महिलांसाठी महात्मा फुले यांनी पहिली शाळा सुरू केली आणि सावित्रीबाई यांनी स्वतः शिक्षण घेऊन महिलांना शिकवण्याचे काम केले त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम फुले दाम्पत्याने केले
त्यामुळे सावित्रीबाई फुले यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा ( ३ जानेवारी ) जन्मदिन "महिला शिक्षण दिन" म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केले. महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले आहे.
Comments
Post a Comment