Skip to main content

विना परवाना आरो प्लांट चालकाला नगरपालिकेची नोटीस कागदपत्रे सादर करा; अन्यथा आरो प्लांट सील – मुख्याधिकारी



 किनवट/ता.प्रतिनिधी- शहरातील १३ जल शुद्धीकरण केंद्र (आरओ प्लांट) मालकांना नगरपरिषद प्रशासनाकडून नोटिसा बजावल्या असून, महाराष्ट्र प्रदूषण विभाग, भूजल सर्वेक्षण व अन्न, प्रशासनाची परवानगीच्या कागदपत्रांच्या पूर्ततेची कागदपत्रे सादर करण्याचे नगरपरिषद प्रशासनाने सूचित केले आहे. अन्यथा प्लांटलाच सील करण्याचा इशारा दिला आहे. नपाच्या या नोटिसामुळे मालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

राज्य शासनाचे प्रदूषण नियंत्रण विभाग, अन्न व प्रशासन आणि भूजल सर्वेक्षण या तिन्ही यंत्रणांच्या परवानगीशिवाय किनवट तालुक्यात मोठ्या प्रमाणात खासगी आरओ व पाणी फिल्टर प्लांट सरार्सपणे सुरू असल्याचे चित्र आहे. साहजिकच यामुळे नागरिकांच्या आरोग्याच प्रश्न निर्माण झाल्याचा तक्रारी यंत्रणांकडून आल्या आहेत. विंधन विहिरीचे पाणी केवळ थंड करून ते वाटर फिल्टरच्या नावावर खपवून नागरिकांची प्रचंड आर्थिक लूट केली जात असल्याची ही अनेक तक्रारी आहेत.

या प्लांट मालकांनी खरोखर नियमानुसार हे प्लांट सुरू केले आहेत की, शासनाच्या परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे सुरू केले आहेत. याची खातरजमा करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नगरपरिषद प्रशासनानेदेखील आपल्या हद्दीतील साधारण १३ आरओ वाॅटर फिल्टर प्लांट मालकांना नुकत्याच नोटिसा जारी करून खुलासा मागवला आहे. त्या तिन्ही यंत्रणांच्या परवानगीची कागदपत्रे सादर करण्याचे सूचित केले आहे. तेही दोन ते तीन दिवसात प्रत्यक्ष स्वतः नगरपरिषद येऊन म्हणने मांडणे आवश्यक आहे. अन्यथा पालिका कुठलीही सबब न एकता वाटर फिल्टर प्लांटलाच सील ठोकणार आहे, असा कडक इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

नगरपरिषदेच्या अशा धडाकेबाज कारवाईमुळे मालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. आजतागायत वॉटर फिल्टर प्लांटच्या खऱ्या वस्तुस्थतीबाबत कोणीच दखल घेत नव्हते, त्यामुळे सदर प्लांट मालकांचेदेखील चांगलेच फावले आहे. आता अशा मालकांवर प्रशासनाने वक्रदृष्टी वळविल्याने त्यांचे पितळ उघडे पडणार आहे. मात्र पालिका प्रशासनाने कारवाईबाबत प्रामाणिक, कुठलीही गुळमट भूमिका न घेता ठोस कार्यवाही करण्याची सामान्य जनतेची रास्त अपेक्षा आहे.




Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...