Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने आंतरराष्ट्रीय धावपट्टू तहसीलदार ललिता बाबर यांचे स्वागत



 माणगाव : आंतरराष्ट्रीय धावपट्टू ललिता बाबर यांची रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे नूकतीच क्रीडा कोट्यातून तहसीलदार पदावर नेमणूक करण्यात आली असून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, माणगाव शाखेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद गोरेगावकर, माणगाव तालुकाध्यक्ष रिजवान मुकादम, तालुका संघटक प्रसाद देवलेकर, तळा तालुकाध्यक्ष सुरेंद्र शेलार आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मा. ललिता बाबर यांच्याशी विविध विषयावर चर्चा करून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

सातारा जिल्ह्यातील माण परिसरात असलेल्या मोही या छोट्याशा खेडेगावात जन्मलेल्या ललिता बाबर आंतरराष्ट्रीय स्तरावर पी.टी.उषा व कविता राऊत यांचा वारसा पुढे चालविण्याचे काम ललिता बाबर यांनी केले आहे. पंधराशे मीटर धावण्याच्या शर्यतीपासून सुरूवात करून त्यांनी मॅरेथाॅन स्पर्धामध्ये भाग घेण्यास सुरूवात केली. सलग तीनवेळा त्यांनी मुंबई मॅरेथाॅन जिंकली आहे. मॅरेथाॅननंतर त्यांचं अनेकांना नावही माहिती नसलेल्या तीन हजार मीटर स्टीपलचेस या खेळाकडे आपला मोर्चा वळवला. या खेळातही त्यांनी आपला ठसा उमटविला. राष्ट्रीय विक्रम तर त्यांनी नोंदवलाच ; पण जखमी असूनही रिओ दी जानरो येथे सन २०१६ मध्ये झालेल्या आॅलिंपिक स्पर्धेत पहिल्या दहामध्ये येण्याचा पराक्रम केला. त्यांच्या खेळातील या योगदानांबद्दल त्यांना अर्जून पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे. फेडरेशन आॅफ इंडियन चेंबर्स आॅफ काॅमर्स अॅण्ड इंडस्ट्रीने आणि भारताच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने 2015 मध्ये स्पोर्टस पर्सन आॅफ दी ईयर हा पुरस्कारही त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे राज्य शासनाने क्रीडा कोट्यातून त्यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड करण्यात आली आहे. सन २०१९ पासून त्यांचे विविध ठिकाणी प्रशिक्षण सुरू आहे. प्रत्यक्ष काम करण्यासाठी त्यांची माणगाव येथे परिक्षाविधिन तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खेळाडू म्हणून काम करतांना पत्रकारांचे सहकार्य सातत्यांने लाभले असल्याची भावना ललिता बाबर यांनी व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.