Skip to main content

आदिवासी जागला आज बिरसा कळाया लागला, क्रांतीची मशाल घेऊन पुढे चालाया लागला...बिरसा जयंती निमित्त रंगली काव्य मैफल : क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचा उपक्रम



✍️राजेश पाटील

किनवट ( प्रतिनिधी ) :

क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती निमित्त नांदेड जिल्ह्यातील किनवट आदिवासी डोंगरी तालुक्यातील अंबाडी घाटातील वनक्षत्र कुंडी पठार येथे क्रांतीसुर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र आयोजित काव्यमैफलित क्रांतिकारक रचना सादर करून बीरसांचा विचारांची पेरणी केली.


कवीसंमेलन अध्यक्ष म्हणून 'मी उजेड शोधतोय' या कवितासंग्रहाचे कवी सुभाष बोड्डेवार होते. पत्रकार गोकुळ भवरे, सांगावाकार महेंद्र नरवाडे, रमेश मुनेश्वर, प्रदीप कुडमेथे, रुपेश मुनेश्वर, रामस्वरूप मडावी, व छायाचित्रकार निवेदक कानिंदे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले तर आभार युवाकवी पंकज भवरे यांनी मानले.


"छातीत वादळ फिरून जात कधी कधी 

माझ्या गल्लीतलं 

उघडे-नागड आदिवासी पोरगं

उजेड गच्च भरून घेऊ पाहणारे

त्यांचे आदिम अंधाराची डोळे

शोधत असतात युगप्रवर्तक पहाट 

कधी घरात कधी उरात 

तर कधी पोटात 

पेटत असलेल्या उपवासी वणव्यात 

तेव्हा दर क्षणी 

जळत असतो माझ्या मनात शब्दसूर्य.. "

..कवी संमेलनाध्यक्षांनी सामाजिक परिस्थिती विशद करणारी क्रांतिकारक रचना सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली.


"आदिवासी जागला आज

 बिरसा कळाया लागला, 

क्रांतीची मशाल घेऊन 

पुढे चालाया लागला..

आदिवासी सेना हो त्यांनी उभी केली 

परकीयांचे सत्ता ती झुगारून दिली 

जंगल जल जमीन आमची

 डरकाळी फोडाया लागला.. "

क्रांतीची मशाल घेऊन पुढे चालाया लागला.. "

..क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे रमेश मुनेश्र्वर यांनी आदिवासी जागृत होऊन प्रगती करीत असल्याचे सकारात्मक रचना सादर केली.


"इतिहासाच्या पानामध्ये 

जाणून घ्या घ्या हो स्थान 

पहा बिरसाचा उलगुलान..

आदिवासींच्या हक्कासाठी

 लढला तो वीर जवान.. "

..बिरसा एक इतिहासाचं सोनेरी पान आपल्या हक्कासाठी जीवाची पर्वा न करता लढणारा क्रांतीवीर महेंद्र नरवाडे यांनी क्रांतिकारक रचना सादर करून त्यांच्या कार्याची महती सांगितली.


"जल जमीन जंगल शाबूत ठेवू गा,

बिरसा चे विचार समजून घेउ गा..

जंगल आमचं घरदार,

जंगलावर हक्क आमचा

त्यांच्यासाठी डोक्यामध्ये पेरत जाऊ उलगुलान.. "

..कवी गीतकार रुपेश मुनेश्वर यांनी गेय कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.


"आता मात्र त्रानहीही संपले होते

 डोळ्यातले आसवांचे पाणीही आटले होते 

देश रक्षणार्थ तुझे जीवन संपले ते मी ऐकले होते 

तेव्हा माझ्या अंत्ययात्रेची वाट मी पाहत होते 

आसुसलेले मन वाट तुझीच पाहत होते.. "

.. कवी रामस्वरूप मडावी यांनी शहीद सैनिका प्रति आदरभाव व्यक्त करणारी रचना सादर केली.


"बाबा गोनना हरमिंग मेहोन

नाकूने शाळाते वाटा गो

बाबा गोनना हेरंग मेहोन

बाबा गोनना सालदेन मनोन नाकूने शाळाते वाटा गो.. " 

.. जंगो रायताड आदिवासी कुलदैवत प्रतिष्ठानचे प्रदीप कुडमेथे यांनी आदिवासी समाजातील मुले शिक्षणाकडे वळावेत तरच त्यांच्या प्रगती होईल अशा आशयाची गोंडी भाषेतील रचना सादर करून वाहवा मिळविली.


निसर्गरम्य ठिकाणी रंगलेल्या या काव्य मैफलित कोरोना कोविड १९ संदर्भात शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करुन घेण्यात आला होतो. एकापेक्षा एक क्रांतीकारक रचना सादर उपस्थित कविंनी सादर करून वाहवा मिळविली.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला