Skip to main content

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त काव्यमैफल रंगली !



 "जागले एक स्वप्न नवे मंद का श्वास आहे,

गुंतले तुझ्यात मी प्रेमाचा आभास आहे.."

नांदेड ( प्रतिनिधी )

अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंच महाराष्ट्र शाखा नांदेड यांच्यावतीने आयोजित कोजागिरी पौर्णिमेनिमित्त घेण्यात आलेली ऑनलाईन काव्यमैफल बहारदार रंगली.


काव्य मैफलीच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक वीरभद्र मिरेवाड होते तर नांदेड जिल्हाध्यक्ष रमेश मुनेश्वर हे उद्घाटक होते. कविसंमेलनात कवी मिलिंद जाधव, राणी नेमानीवार, साहेबराव कांबळे . रुपेश मुनेश्वर, अर्चना गरुड, विजया तारु, महेंद्र नरवाडे, गणपत गायकवाड, मनोहर बसवंते, सूर्यभान खंदारे, सागर गौरव, सोनबा दवणे सहभागी होते.



रमेश मुनेश्वर यांनी 'शब्द:चक्षु' ही कविता सादर करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले तर 'मातीत शाबूत राहावी म्हणून ' ही कविता कवी संमेलनाध्यक्ष वीरभद्र मिरेवाड यांनी सादर करून कार्यक्रमाची बहारदार सुरुवात केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणी नेमानीवार यांनी केले, प्रास्ताविक सरचिटणीस मिलिंद जाधव यांनी केले, तर आभार रुपेश मुनेश्वर यांनी केले.


साहेबराव कांबळे या कवीने सुंदरसे रचना सादर करून वाहवा मिळवली..

"गाली खळी तुझ्या ग 

लोचनांनी या लुटावी, 

येताच जवळी सखे ग 

का पापणी तू मिटावी.."


यानंतर अर्चना गरुड या कवयित्रीने सुंदर कविता सादर केली..

"चांदण्या रात्रीला 

हवास तू कवेत 

ऋणानुबंधाची नाते 

जुळो तुझं सवेत.."


कवयत्री राणी नेमानीवार बहारदार रचना सादर करून दाद मिळविली..

"जागले एक स्वप्न नवे 

मंद का श्वास आहे, 

गुंतले तुझ्यात मी प्रेमाचा आभास आहे.."


"रंग प्रेमाचा असतो कसा

कळण्याआधीच रंग तो जसा

जसा जसा रंगत जातो 

तसा गोडवा भरत राहतो.."

कवयत्री विजया तारू यांनी ही सुंदर रचना सादर केली.


"का जातीस दूर अशी 

दिव्यातील वात बाकी आहे,

ये जवळ जराशी अजूनही

आपली बात बाकी आहे.."

कवी मनोहर बसवंते यांची ही कविता भाव खाऊन गेली.


सांगावा कार महेंद्र नरवाडे यांनी कविता सादर करून वाहवा मिळविली..

"हे कविते, तुझा शिल्पकार

होण्याचे भाग्य मला आज मिळालं 

माझ्या रोमारोमात उठणारे 

तरंग शब्दमय झाले.."


यानंतर मिलिंद जाधव यांनी सुंदरशी कविता सादर केली..

"परसबागी, चाफा पांढरा 

प्रिय चंद्रा, माझ्या दारी 

सखे ये ना.. एकदाच 

आनंदच बघायला.. "


कवी रुपेश मुनेश्वर यांनी गेय रचना सादर करून मैफिल जिंकली..

" ये पाऊसधारा घेऊन 

ये मोरपिसारा लेऊन 

ये सखे साजणी 

प्रीतीने न्हाऊनी.. "


सूर्यभान खंदारे यांनी कविता सादर करून दाद मिळविली..

"निळ्याशार आकाशात

पुनवचा चंद्र आला,

नक्षत्रांच्या भेटीला

चंद्र आहे साक्षीला.."


नजर तिची न माझी

झाली नजरानजर

झाली नजरानजर

ती झाली अजरामर..

कवी सोनबा दवणे यांनी प्रितिची रचना सादर केली.


"तुझी रे छाया, मीच राया

नको विस्मरण, क्षणाचेही.."

कवयत्री उर्मीला परभणकर यांनी सुंदरसी कविता सादर केली.


राजू भगत यांनी प्रेम व्यक्त करणारी कविता सादर केली..

" प्रेम असावे असे

सूईच्या टोकावरही 

लक्ष भार पेलणारे,

तुडूंब सागरातही,

वलय निर्माण करणारे "


गणपत गायकवाड व सागर गोख यांनीही बहारदार रचना सादर केल्या. गुगल मिटवर झालेल्या या कविसंमेलनास बहूसंख्येने ऑनलाईन श्रोते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला