Skip to main content

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त काव्यमैफल रंगली !



 "जागले एक स्वप्न नवे मंद का श्वास आहे,

गुंतले तुझ्यात मी प्रेमाचा आभास आहे.."

नांदेड ( प्रतिनिधी )

अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंच महाराष्ट्र शाखा नांदेड यांच्यावतीने आयोजित कोजागिरी पौर्णिमेनिमित्त घेण्यात आलेली ऑनलाईन काव्यमैफल बहारदार रंगली.


काव्य मैफलीच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक वीरभद्र मिरेवाड होते तर नांदेड जिल्हाध्यक्ष रमेश मुनेश्वर हे उद्घाटक होते. कविसंमेलनात कवी मिलिंद जाधव, राणी नेमानीवार, साहेबराव कांबळे . रुपेश मुनेश्वर, अर्चना गरुड, विजया तारु, महेंद्र नरवाडे, गणपत गायकवाड, मनोहर बसवंते, सूर्यभान खंदारे, सागर गौरव, सोनबा दवणे सहभागी होते.



रमेश मुनेश्वर यांनी 'शब्द:चक्षु' ही कविता सादर करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले तर 'मातीत शाबूत राहावी म्हणून ' ही कविता कवी संमेलनाध्यक्ष वीरभद्र मिरेवाड यांनी सादर करून कार्यक्रमाची बहारदार सुरुवात केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणी नेमानीवार यांनी केले, प्रास्ताविक सरचिटणीस मिलिंद जाधव यांनी केले, तर आभार रुपेश मुनेश्वर यांनी केले.


साहेबराव कांबळे या कवीने सुंदरसे रचना सादर करून वाहवा मिळवली..

"गाली खळी तुझ्या ग 

लोचनांनी या लुटावी, 

येताच जवळी सखे ग 

का पापणी तू मिटावी.."


यानंतर अर्चना गरुड या कवयित्रीने सुंदर कविता सादर केली..

"चांदण्या रात्रीला 

हवास तू कवेत 

ऋणानुबंधाची नाते 

जुळो तुझं सवेत.."


कवयत्री राणी नेमानीवार बहारदार रचना सादर करून दाद मिळविली..

"जागले एक स्वप्न नवे 

मंद का श्वास आहे, 

गुंतले तुझ्यात मी प्रेमाचा आभास आहे.."


"रंग प्रेमाचा असतो कसा

कळण्याआधीच रंग तो जसा

जसा जसा रंगत जातो 

तसा गोडवा भरत राहतो.."

कवयत्री विजया तारू यांनी ही सुंदर रचना सादर केली.


"का जातीस दूर अशी 

दिव्यातील वात बाकी आहे,

ये जवळ जराशी अजूनही

आपली बात बाकी आहे.."

कवी मनोहर बसवंते यांची ही कविता भाव खाऊन गेली.


सांगावा कार महेंद्र नरवाडे यांनी कविता सादर करून वाहवा मिळविली..

"हे कविते, तुझा शिल्पकार

होण्याचे भाग्य मला आज मिळालं 

माझ्या रोमारोमात उठणारे 

तरंग शब्दमय झाले.."


यानंतर मिलिंद जाधव यांनी सुंदरशी कविता सादर केली..

"परसबागी, चाफा पांढरा 

प्रिय चंद्रा, माझ्या दारी 

सखे ये ना.. एकदाच 

आनंदच बघायला.. "


कवी रुपेश मुनेश्वर यांनी गेय रचना सादर करून मैफिल जिंकली..

" ये पाऊसधारा घेऊन 

ये मोरपिसारा लेऊन 

ये सखे साजणी 

प्रीतीने न्हाऊनी.. "


सूर्यभान खंदारे यांनी कविता सादर करून दाद मिळविली..

"निळ्याशार आकाशात

पुनवचा चंद्र आला,

नक्षत्रांच्या भेटीला

चंद्र आहे साक्षीला.."


नजर तिची न माझी

झाली नजरानजर

झाली नजरानजर

ती झाली अजरामर..

कवी सोनबा दवणे यांनी प्रितिची रचना सादर केली.


"तुझी रे छाया, मीच राया

नको विस्मरण, क्षणाचेही.."

कवयत्री उर्मीला परभणकर यांनी सुंदरसी कविता सादर केली.


राजू भगत यांनी प्रेम व्यक्त करणारी कविता सादर केली..

" प्रेम असावे असे

सूईच्या टोकावरही 

लक्ष भार पेलणारे,

तुडूंब सागरातही,

वलय निर्माण करणारे "


गणपत गायकवाड व सागर गोख यांनीही बहारदार रचना सादर केल्या. गुगल मिटवर झालेल्या या कविसंमेलनास बहूसंख्येने ऑनलाईन श्रोते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...