Skip to main content

किनवट शहरात विविध ठिकाणी ६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन हर्षोल्हासात साजरा




(किनवट शहर प्रतिनिधी ):

:भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखेच्या वतीने रविवारी(दि.२५)६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन शहर व परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला.किनवट व गोकुंदा परिसरातल वार्ड व नगरामध्ये सकाळी ७:३०वाजता धम्मध्वजारोहण    करण्यात आले.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय, गोकुंदा येथे सकाळी ठिक ८:३०वाजता धम्मध्वजारोहण व वंदना घेण्यात आली. किनवट येथील मुख्य कार्यक्रम  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात सकाळी दहा वाजता झाला. तालुका अध्यक्ष  अभियंता प्रशांत ठमके  यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण  करण्यात आले.याप्रसंगी संस्कार विभागाच्या वतीने महेंद्र नरवाडे व अनिल उमरे यांनी सामुहिक  वंदना घेतली.सिद्धार्थनगर येथील जेतवन बुद्ध विहारात सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी गंगाधर कावळे यांच्या हस्ते पंचरंगी ध्वजारोहण करण्यात आले.सूत्रसंचालन प्रा.सुबोध सर्पे यांनी कले.२२ प्रतिज्ञा चे सामुदायिक वाचन महेंद्र नरवाडे यांनी केले.

     यावेळी विनोद भरणे,देविदास मुनेश्वर, प्रा.अंबादास कांबळे,प्रा.पंजाब शेरे,उत्तम कानिंदे,प्रा.रविकांत सर्पे,प्राचार्या शुभांगी ठमके,संगिता पाटील,दिव्या सर्पे , चंद्रभागाबाई कावळे , योजना पाटील, पंचाबाई सर्पे, ललीता मुनेश्वर, सागरबाई नगारे, पुनम   तथागत कावळे , सुमीत्राबाई कावळे, लक्ष्मीबाई पाटील, रोहीणी मुनेश्वर, कांताबाई सर्पे, सुशीला ठमके, शोभा भवरे, शेशीकला कावळे, माला नगारे, राहीबाई पाटील, करूना पवार, सारजाबाई कावळे, वर्षा ठमके, सुरेश पाटील,दीपक ओंकार,मिलिंद धावारे,मल्लुजी येरेकार,राजाराम वाघमारे, एस.के.राऊत,वाठोरेसर,रुपेश मुनेश्वर, दिलिप पाटील,विवेक ओंकार, जी.एस.रायबोळे,सुनिल येरेकार,नितिन कावळे,मिलिंद सर्पे,रमेश मुनेश्वर, राजेश पाटील, यांच्यासह

भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा किनवटचे पदाधिकारी व विविध नगरातील पदाधिकारी ,बौद्ध उपासक- उपासिका यांनी शारीरिक अंतर ठेवून व शासनाचे नियमाचे पालन करुन कार्यक्रम यशस्वी केला,अशी माहिती बौद्ध महासभेचे तालुका सचिव आयु.महेंद्र नरवाडे  यांनी दिली आहे.





Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...