Skip to main content

किनवट शहरात विविध ठिकाणी ६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन हर्षोल्हासात साजरा




(किनवट शहर प्रतिनिधी ):

:भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखेच्या वतीने रविवारी(दि.२५)६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन शहर व परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला.किनवट व गोकुंदा परिसरातल वार्ड व नगरामध्ये सकाळी ७:३०वाजता धम्मध्वजारोहण    करण्यात आले.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय, गोकुंदा येथे सकाळी ठिक ८:३०वाजता धम्मध्वजारोहण व वंदना घेण्यात आली. किनवट येथील मुख्य कार्यक्रम  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात सकाळी दहा वाजता झाला. तालुका अध्यक्ष  अभियंता प्रशांत ठमके  यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण  करण्यात आले.याप्रसंगी संस्कार विभागाच्या वतीने महेंद्र नरवाडे व अनिल उमरे यांनी सामुहिक  वंदना घेतली.सिद्धार्थनगर येथील जेतवन बुद्ध विहारात सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी गंगाधर कावळे यांच्या हस्ते पंचरंगी ध्वजारोहण करण्यात आले.सूत्रसंचालन प्रा.सुबोध सर्पे यांनी कले.२२ प्रतिज्ञा चे सामुदायिक वाचन महेंद्र नरवाडे यांनी केले.

     यावेळी विनोद भरणे,देविदास मुनेश्वर, प्रा.अंबादास कांबळे,प्रा.पंजाब शेरे,उत्तम कानिंदे,प्रा.रविकांत सर्पे,प्राचार्या शुभांगी ठमके,संगिता पाटील,दिव्या सर्पे , चंद्रभागाबाई कावळे , योजना पाटील, पंचाबाई सर्पे, ललीता मुनेश्वर, सागरबाई नगारे, पुनम   तथागत कावळे , सुमीत्राबाई कावळे, लक्ष्मीबाई पाटील, रोहीणी मुनेश्वर, कांताबाई सर्पे, सुशीला ठमके, शोभा भवरे, शेशीकला कावळे, माला नगारे, राहीबाई पाटील, करूना पवार, सारजाबाई कावळे, वर्षा ठमके, सुरेश पाटील,दीपक ओंकार,मिलिंद धावारे,मल्लुजी येरेकार,राजाराम वाघमारे, एस.के.राऊत,वाठोरेसर,रुपेश मुनेश्वर, दिलिप पाटील,विवेक ओंकार, जी.एस.रायबोळे,सुनिल येरेकार,नितिन कावळे,मिलिंद सर्पे,रमेश मुनेश्वर, राजेश पाटील, यांच्यासह

भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा किनवटचे पदाधिकारी व विविध नगरातील पदाधिकारी ,बौद्ध उपासक- उपासिका यांनी शारीरिक अंतर ठेवून व शासनाचे नियमाचे पालन करुन कार्यक्रम यशस्वी केला,अशी माहिती बौद्ध महासभेचे तालुका सचिव आयु.महेंद्र नरवाडे  यांनी दिली आहे.





Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...