Skip to main content

राष्ट्रीय सेवा योजना व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अभ्यास केंद्र बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,किनवटच्या वतीने माझे कुंटूब, माझी जबाबदारी माहीम अंतर्गत जनजागृती


 (गोकुंदा ग्रामीण:प्रतिनिधी) 

 बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ,नाशिक अभ्यास केंद्र बळीराम पाटील महाविद्यालय ,किनवटच्या वतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम अंतर्गत किनवट परिसरातील जनतेचे  कोरोना विषयी जनजागृती करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड, संस्थेचे सर्व सन्मानीय पदाधिकारी, प्राचार्य डाॅ. एस. के. बेंबरेकर, उपप्राचार्य प्रा. राजकुमार नेम्मानीवार, पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील यांच्या  मार्गदर्शनाखाली किनवट तालुक्यातील नवाखेडा येथे रासेयो स्वयंसेवक यांनी कोरोना, महामारीपासून बचाव करण्यासाठी रोज स्वच्छ हात धुवावे,मास्क वापरावे, कणकण वाटत असल्यास दवाखाण्यात दाखवावे. बाहेरुन आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुऊनंच घरात जावे. आपल्या कुटुंबाला कोरोनापसून दूर ठेवण्याची जबाबदारी तुमचीच आहे. ताप, खोकला, सर्दी, गळयात त्रास होत असेल तर दवाखाण्यात जाऊन तपासणी करुन घ्यावे असे जनजागृती करतांना रासेयो स्वयंसेवक सांगत आहेत.ही मोहीम यशस्वी करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, शाखा किनवट क्रेंद्र संयोजक प्रा. शिवदास बोकडे, सहसंयोजक डॉ.योगेश सोमवंशी, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. पंजाब शेरे, प्रा. सुलोचना जाधव, प्रा. राहुल मुनेश्वर, श्रीराम खिल्लारे, शुभम गाजलवार, संजय थोरात, कपील जाधव, सुरज आढागळे, शादाब, संजय चुनगुनवार, किशोर आडे, जगदीश आडे इ. स्वयंसेवक सहकार्य करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...