Skip to main content

कु.रक्षा नगराळे यांना राज्यस्तरीय आदर्श साहित्यसेवक भाषागौरव पुरस्काराने सन्मानित

(यवतमाळ/राळेगाव प्रतिनिधी)

राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन २०२० पुरस्कार सोहळा मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन आणि पुरस्कार वितरण शानदार सोहळा नुकताच संपन्न झाला.महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रांतून पुरस्कारासाठी निवडलेल्या १०१ मानकऱ्यांना या सोहळ्यात मानाचा फेटा,मानकरी बॅच,महावस्त्र, गौरवपदक,सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरूपात राज्यस्तरीय पुरस्कार थाटात प्रदान करण्यात आला.आदर्श साहित्यसेवक भाषागौरव पुरस्कार

या पुरस्काराची मानकरी राळेगाव येथील भारतीय नारी रक्षा संघटनेच्या सदस्यां सौ.दिक्षा नगराळे यांची कन्या कु.रक्षा नगराळे ठरली राज्यस्तरीय आदर्श साहित्यसेवक भाषागौरव २०२० हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प श्री. केशव जी महाराज सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तत्वचिंतक ह भ प श्री श्यामसुंदर महाराज सोन्नर,ज्येष्ठ समाजसेवक श्री. अशोकानंद जी जवळगावकर,ज्येष्ठ साहित्यिक श्री. रमेश आव्हाड,ज्येष्ठ पत्रकार श्री.सदानंद खोपकर, सुप्रसिद्ध आदर्श शिक्षिका श्रीमती मनिषा कदम घार्गे मॅडम,प्राचार्या श्रीमती रोशनी शिंदे मॅडम, प्राचार्या श्रीमती कल्पिता पर्शराम,प्राचार्या श्रीमती प्रगती साळवेकर,सामाजिक नेत्या डॉ.शुभदा जोशी तसेच आयकर अधिकारी श्रीमती अरुणा परब यांनी या समारंभाला विशेष पाहुणे म्हणून उपस्थिती नोंदविली,व्यासपीठावर शिवयोगी मीराताई आणि प्रगतिशील शेतकरी उद्योजक श्री.पांडुरंग दादा मातेरे उपस्थित होते.या राज्यस्तरीय समारंभाचे अतिशय उत्तम व्यवस्थापन श्री. राजेंद्रदादा सरोदे यांनी पाहिले.या ऑनलाईन समारंभाचे सूत्रसंचालन गुणिजन परिवाराचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट श्री.कृष्णाजी जगदाळे यांनी केले.अध्यक्ष ऍडव्होकेट श्री.कृष्णाजी जगदाळे यांनी उपस्थितांना सोहळ्याच्या समारोपात तमाम महिला वर्गाने राष्ट्रवंदना सादर करून उत्साहात समारंभाची सांगता केली.



Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...