राजेश पाटील किनवट:
रस्त्यावरील अपघात प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे यामुळे काहीही दोष नसलेले विनाकारण नागरिक मारल्या जात आहे त्यामुळे रोड सेफ्टी या कार्यक्रमाची सुरुवात धरती आबा बिरसा मुंडा संशोधन व अध्ययन केंद्र रामनगर किनवट च्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे. त्यामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे ही जनजागृती आजच्या काळाची खूप मोठी गरज आहे. आपण घरातून बाहेर पडल्यावर आपलं कुटुंब आपली आतुरतेने वाट पाहत असते त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी गाडी हळुवार चालवावी तसेच आपल्या आजूबाजूला देखील याबाबत जागृती करावी.
यावेळी प्रा. संतोष पावार, प्रा. डॉ. पंजाब शेरे, संजय धोबे, सातरवार सर, प्रा. डॉ. आनंद भालेराव , सामाजिक कार्यकर्ते मारोती सुंकलवाड, गावंडे सर, आहुजा भाई, ॲड. काळे सर, एकलारकर बंधु तसेच पोलीस बंधु सर नागरिकांनी जनजागृती केली.

Comments
Post a Comment