Skip to main content

महिंद्रा प्राइड क्लासरूम तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न; प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात




किनवट : महिंद्रा प्राइड क्लासरूम व नांदी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली. या कार्यशाळेद्वारे विद्यार्थ्यांना विविध रोजगाराभिमुख कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले.

कार्यशाळेसाठी नांदी फाउंडेशनचे मुख्य प्रशिक्षक अक्षय मेश्राम यांनी सलग तीन दिवस विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन केले. कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक डॉ. सुरेंद्र गट्टानी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या आदेशानुसार हा उपक्रम राबविण्यात आला.

आदिवासी भागातील दुर्गम विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पूर्वतयारी म्हणून मुलाखत कौशल्य व व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि ते जागतिक स्पर्धेत सक्षमपणे उभे राहावेत, या दृष्टीने विद्यापीठ प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे केंद्रातील दोन विद्यार्थिनी—ऐश्वर्या पंढरीनाथ सेलूकर व प्रणाली मारोती मेश्राम—यांची केस स्टडी महिंद्रा प्राइडसाठी निवड करण्यात आली आहे. तसेच त्यांनी केंद्राला चार विशेष पुरस्कार प्राप्त करून दिले असून, ही बाब केंद्रासाठी अभिमानास्पद ठरली आहे.

कार्यशाळेच्या समारोपानिमित्त दिनांक 02 एप्रिल रोजी प्रमाणपत्र वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान केंद्राचे समन्वयक डॉ. नितीन गायकवाड यांनी भूषविले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सल्लागार समिती सदस्य डॉ. मार्तंड कुलकर्णी उपस्थित होते. त्यांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सक्रिय सहभाग नोंदवून कौशल्यविकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याचे मान्यवरांनी नमूद केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रिती देवस्थळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. योगेश अंबुलगेकर यांनी केले. तसेच या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. पवार यांनी केले.


हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रातील प्राध्यापक डॉ. प्रवीण खंडागळे, डॉ. प्रमोद राठोड, प्रा. चेतन जाधव व प्रा. श्रीकांत दुधारे यांनी विशेष परिश्रम घेतले.


कार्यक्रमास शिक्षकवृंद, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...