Skip to main content

सरस्वती विद्या मंदिर महाविद्यालयात बोली भाषेचा जागर




किनवट प्रतिनिधी:

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त बोलींचा जागर हा कार्यक्रम दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी  सरस्वती विद्यामंदिर कला महाविद्यालय किनवट येथे घेण्यात आला. मराठी भाषा ही विविध बोलींनी नटलेली समृद्ध व संपन्न भाषा आहे मराठीच्या विविध बोली या मराठी भाषेचे वैभव आहेत बोलीभाषा ही महाराष्ट्राच्या विशिष्ट प्रदेशात व भागात बोलली जाणारी मराठी भाषेची प्रादेशिक अभिव्यक्ती आहे मराठी भाषेच्या या विविध बोलींचे जतन संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने  मराठी भाषा व उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या संकल्पनेनुसार व भाषा संचालनालयाचे संचालक अरुण गीते यांच्या मार्गदर्शनानुसार  मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये साजरा करण्यात येत आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व सरस्वती विद्या मंदिर कला महाविद्यालय किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात बोलींचा जागर करताना अतिशय दुर्मिळ अशा कोलामी बोली या भाषेवर विचार मंथन करण्यात आले. शोभायात्रा आदिवासी लोककलांचे सादरीकरण, संवाद व बोलींचे वैशिष्ट्य यासोबतच बोलीभाषा अभ्यासक व तज्ञांचे मार्गदर्शन या कार्यक्रमात झाले.



    कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव नेमानेवार यांच्या हस्ते झाले भाषा अभ्यासक  प्राचार्य डॉ. आनंद भंडारे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख व भाषा संचालनालयाचे सल्लागार  व भाषेचे अभ्यासक प्रोफेसर डॉ पृथ्वीराज  तौर, कोलामी बोलीचे अभ्यासक प्रज्ञा प्रतिष्ठान अध्यापक महाविद्यालय नांदेड चे प्राचार्य डॉ. राजू मोतेराव यांनी बोलीचे वैशिष्ट्य व काळानुसार लोकपाबत चालत असलेल्या बोलीं यांची कारण  मीमांसा,, समस्या व उपाययोजना  याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्राचार्य भंडारे यांनी अध्यक्षीय समारोप करताना  युवा पिढीची आणि समाजाची बोली संवर्धनासाठी आवश्यक असलेली भूमिका विशद करत आपल्या परिसरातल्या बोली संवर्धनाच्या कामासाठी युवकांनी अभ्यासकांनी पुढे यावे असे आवाहन केले.  संस्थेचे सचिव मुख्याध्यापक कृष्णकुमार नेमानीवार महाराष्ट्र शासनाच्या भाषा विभागाचे भारत जाधव सुधाकर महाजन व राहुल सूर्यवंशी, सरस्वती कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य डॉ. किरण पाईकराव, संत भगवान बाबा कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आनंद भालेराव   उच्च माध्यमिक विद्यालयाचे सुपरवायझर  प्रा रेणुकादास पहूरकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती 

   यावेळी किनवट परिसरातील महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचा आदिवासी गिरीजन पुरस्कार विजेते मोहन मेश्राम व कौशल्याबाई मेश्राम, लक्ष्मी टिळक उत्कृष्ट वांग्मय पुरस्कार विजेते डॉ. वसंत राठोड 2025 चा कृष्ण वाद्य निर्मिती पुरस्कार विजेते भालेराव दडांजे यांचा यावेळी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. शक्ती नगर घुगरवाडी येथील कोलाम महिला व पुरुषांच्या संचाने विविध प्रकारची गीत प्रस्तुत केली. पाटा गायक मोहन मेश्राम व कौशल्याबाई मेश्राम राजेश्वर मेश्राम यांनी किंगरी वाद्यावर पाटा गायन केले. माध्यमिक शाळेतील शिक्षक करण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींचे लेझीम पथक, वारकरी संप्रदायाचे देवबाजी केंद्रे व सौ प्रमिलाबाई केंद्रे यांच्या टाळ विना यांच्यासह  वारकरी भजन व परमेश्वर मेश्राम आणि राजेश्वर मेश्राम यांच्या आदिवासी पेपर वादनासह संकुल परिसरात शोभायात्रा काढण्यात आली यात महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी व सरस्वती शिक्षण संस्थेतील वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक कर्मचारी उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे यात सहभागी झाले. दीप प्रज्वलन महाराष्ट्र राज्य गीत व विशाखा होळंबे आणि खुशी चव्हाण यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. मराठी विभाग प्रमुख व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ मार्तंड कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले भाषा विभागाचे भारत जाधव यांनी शासनाची या कार्यक्रमाची भूमिका विशद केली. डॉ सुनील व्यवहारे यांनी सूत्रसंचालन केले किरण आईने वार यांनी आभार व्यक्त केले  या कार्यक्रमात किनवट व माहूर परिसरातील विविध बोलींचे संकलन व संवर्धन करण्यासाठी सरस्वती महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या बोली संवर्धन प्रकल्पाची माहिती माहिती उपस्थित त्यांना देण्यात आली, राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.