Skip to main content

किनवट पोलीस स्टेशनला मिळालेल्या फॉरेन्सिक व्हॅनमुळे गुन्हे उघड होण्यास गती मिळणार : पोलीस निरीक्षक चोपडे

 


किनवट : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे तपास प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि न्यायदानात पारदर्शकता आणण्यासाठी किनवट पोलिस दलाला अत्याधुनिक मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन मिळाली आहे.

नांदेड जिल्ह्यासाठी एकूण दोन व्हॅन उपलब्ध झाल्या असून त्यापैकी एक किनवट विभागाला देण्यात आली आहे. या व्हॅनचे कार्यक्षेत्र किनवटपासून भोकरपर्यंत असणार असून, या व्हॅनमुळे गुन्ह्यांचा तपास अधिक जलद आणि परिणामकारक होईल, अशी माहिती किनवट पोलिस ठाण्याचे प्रभारी


निरीक्षक देविदास चोपडे यांनी दिली. ही व्हॅन अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज असून, डीएनए, रक्त, रासायनिक विश्लेषण, तसेच डिजिटल पुराव्यांचे संकलन यासाठी आवश्यक सर्व यंत्रणा त्यात बसविण्यात आल्या आहेत. व्हॅनमध्ये सहा प्रशिक्षित फॉरेन्सिक कर्मचारी कार्यरत राहणार असून ते घटनास्थळी तात्काळ पोहोचून तपासाची प्राथमिक प्रक्रिया सुरू करतील,


या उपक्रमामुळे गुन्हा घडताच घटनास्थळावरील पुरावे तत्काळ गोळा केले जातील आणि सुरक्षित ठेवले जातील. यामुळे पुराव्यांमध्ये छेडछाड होण्याची शक्यता कमी होणार असून, तपास जलद गतीने पूर्ण होईल. प्राथमिक निष्कर्ष मिळवणे सुलभ होईल आणि न्यायालयीन प्रक्रियेत अचूक पुरावे सादर करता येतील.


या सुविधेमुळे किनवट पोलिस दलाचे कार्य अधिक सक्षम आणि पारदर्शक होणार असून, गुन्हेगारीविरोधात अधिक प्रभावी कारवाई करण्यास मदत मिळणार आहे. पोलिस विभागातील हा तांत्रिक उपक्रम न्यायदान प्रक्रियेला विश्वासार्हता देणारा ठरणार आहे.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.