Skip to main content

किनवट पोलीस स्टेशनला मिळालेल्या फॉरेन्सिक व्हॅनमुळे गुन्हे उघड होण्यास गती मिळणार : पोलीस निरीक्षक चोपडे

 


किनवट : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे तपास प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि न्यायदानात पारदर्शकता आणण्यासाठी किनवट पोलिस दलाला अत्याधुनिक मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन मिळाली आहे.

नांदेड जिल्ह्यासाठी एकूण दोन व्हॅन उपलब्ध झाल्या असून त्यापैकी एक किनवट विभागाला देण्यात आली आहे. या व्हॅनचे कार्यक्षेत्र किनवटपासून भोकरपर्यंत असणार असून, या व्हॅनमुळे गुन्ह्यांचा तपास अधिक जलद आणि परिणामकारक होईल, अशी माहिती किनवट पोलिस ठाण्याचे प्रभारी


निरीक्षक देविदास चोपडे यांनी दिली. ही व्हॅन अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज असून, डीएनए, रक्त, रासायनिक विश्लेषण, तसेच डिजिटल पुराव्यांचे संकलन यासाठी आवश्यक सर्व यंत्रणा त्यात बसविण्यात आल्या आहेत. व्हॅनमध्ये सहा प्रशिक्षित फॉरेन्सिक कर्मचारी कार्यरत राहणार असून ते घटनास्थळी तात्काळ पोहोचून तपासाची प्राथमिक प्रक्रिया सुरू करतील,


या उपक्रमामुळे गुन्हा घडताच घटनास्थळावरील पुरावे तत्काळ गोळा केले जातील आणि सुरक्षित ठेवले जातील. यामुळे पुराव्यांमध्ये छेडछाड होण्याची शक्यता कमी होणार असून, तपास जलद गतीने पूर्ण होईल. प्राथमिक निष्कर्ष मिळवणे सुलभ होईल आणि न्यायालयीन प्रक्रियेत अचूक पुरावे सादर करता येतील.


या सुविधेमुळे किनवट पोलिस दलाचे कार्य अधिक सक्षम आणि पारदर्शक होणार असून, गुन्हेगारीविरोधात अधिक प्रभावी कारवाई करण्यास मदत मिळणार आहे. पोलिस विभागातील हा तांत्रिक उपक्रम न्यायदान प्रक्रियेला विश्वासार्हता देणारा ठरणार आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...