Skip to main content

किनवट पोलीस स्टेशनला मिळालेल्या फॉरेन्सिक व्हॅनमुळे गुन्हे उघड होण्यास गती मिळणार : पोलीस निरीक्षक चोपडे

 


किनवट : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे तपास प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि न्यायदानात पारदर्शकता आणण्यासाठी किनवट पोलिस दलाला अत्याधुनिक मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन मिळाली आहे.

नांदेड जिल्ह्यासाठी एकूण दोन व्हॅन उपलब्ध झाल्या असून त्यापैकी एक किनवट विभागाला देण्यात आली आहे. या व्हॅनचे कार्यक्षेत्र किनवटपासून भोकरपर्यंत असणार असून, या व्हॅनमुळे गुन्ह्यांचा तपास अधिक जलद आणि परिणामकारक होईल, अशी माहिती किनवट पोलिस ठाण्याचे प्रभारी


निरीक्षक देविदास चोपडे यांनी दिली. ही व्हॅन अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज असून, डीएनए, रक्त, रासायनिक विश्लेषण, तसेच डिजिटल पुराव्यांचे संकलन यासाठी आवश्यक सर्व यंत्रणा त्यात बसविण्यात आल्या आहेत. व्हॅनमध्ये सहा प्रशिक्षित फॉरेन्सिक कर्मचारी कार्यरत राहणार असून ते घटनास्थळी तात्काळ पोहोचून तपासाची प्राथमिक प्रक्रिया सुरू करतील,


या उपक्रमामुळे गुन्हा घडताच घटनास्थळावरील पुरावे तत्काळ गोळा केले जातील आणि सुरक्षित ठेवले जातील. यामुळे पुराव्यांमध्ये छेडछाड होण्याची शक्यता कमी होणार असून, तपास जलद गतीने पूर्ण होईल. प्राथमिक निष्कर्ष मिळवणे सुलभ होईल आणि न्यायालयीन प्रक्रियेत अचूक पुरावे सादर करता येतील.


या सुविधेमुळे किनवट पोलिस दलाचे कार्य अधिक सक्षम आणि पारदर्शक होणार असून, गुन्हेगारीविरोधात अधिक प्रभावी कारवाई करण्यास मदत मिळणार आहे. पोलिस विभागातील हा तांत्रिक उपक्रम न्यायदान प्रक्रियेला विश्वासार्हता देणारा ठरणार आहे.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...