Skip to main content

ग्रंथालये बंद पडण्याच्या मार्गावर शासनाची उदासीनता कारणीभूत ठरत असल्याची खंत

 


किनवटदि.२२ : शासनाच्या ग्रंथालय चळवळीच्या बाबतीत उदासीन वेळकाढू धोरणामुळे ग्रंथालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. 'गाव तेथे ग्रंथालय' ही चळवळ सक्षम करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा वेतनश्रेणीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी किनवट व माहूर तालुक्यातील ग्रंथालयीन कर्मचारी व पदाधिकारी यांची आहे.

  नांदेड जिल्ह्यात एकूण ७५८ ग्रंथालये आहेत. त्यापैकी अनेक ग्रंथालये बंद पडली आहेत. 'गाव तेथे ग्रंथालय' असे शासनाचे धोरण असले तरी ही ग्रंथालय चळवळ जिवंत ठेवण्याकडे मात्र शासनाचे लक्ष नाही वाढत्या महागाईमुळे उदरनिर्वाह व ग्रंथालयीन चळवळ चालवणे अवघड होत असल्याने ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करावी, अशी मागणी गेली बारा वर्षांपासून होत आहे, उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ६० टक्के अनुदानात वाढ केली व उर्वरित ४० टक्के लवकरच देऊ तसेच जून २०२४ पासून दर्जावाढ देऊ, असे आश्वासन दिले; पण वेतनश्रेणीच्या प्रश्नास बगल दिली.शासनाने ग्रंथालयीन चळवळ जिवंत ठेवण्यासाठी वरील सर्व प्रश्न

तातडीने सोडवावेत अशी मागणी किनवट तालुका ग्रंथालय  संघाचे अध्यक्ष ॲड.मिलिंद सर्पे व सचिव प्रा . दगडू भरकड यांनी शासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

● ग्रंथालयाला शासनाने साठ टक्के अनुदानवाढ दिली. मात्र, चाळीस टक्के मागील तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. नवीन ग्रंथालयांना मान्यता नाही व दर्जावाढ अद्याप बंद आहे. येत्या नऊ मार्चला हदगाव येथे ग्रंथालय संघाचे अधिवेशन आहे. किनवट व माहूर तालुक्यातील सर्व ग्रंथालयचालकांनी या अधिवेशनास उपस्थित राहावे.

उध्दव रामतिर्थकर, कार्याध्यक्ष किनवट तालुका ग्रंथालय संघ, किनवट 

-------------------------------------------------------•

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.