Skip to main content

ग्रंथालये बंद पडण्याच्या मार्गावर शासनाची उदासीनता कारणीभूत ठरत असल्याची खंत

 


किनवटदि.२२ : शासनाच्या ग्रंथालय चळवळीच्या बाबतीत उदासीन वेळकाढू धोरणामुळे ग्रंथालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. 'गाव तेथे ग्रंथालय' ही चळवळ सक्षम करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा वेतनश्रेणीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी किनवट व माहूर तालुक्यातील ग्रंथालयीन कर्मचारी व पदाधिकारी यांची आहे.

  नांदेड जिल्ह्यात एकूण ७५८ ग्रंथालये आहेत. त्यापैकी अनेक ग्रंथालये बंद पडली आहेत. 'गाव तेथे ग्रंथालय' असे शासनाचे धोरण असले तरी ही ग्रंथालय चळवळ जिवंत ठेवण्याकडे मात्र शासनाचे लक्ष नाही वाढत्या महागाईमुळे उदरनिर्वाह व ग्रंथालयीन चळवळ चालवणे अवघड होत असल्याने ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करावी, अशी मागणी गेली बारा वर्षांपासून होत आहे, उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ६० टक्के अनुदानात वाढ केली व उर्वरित ४० टक्के लवकरच देऊ तसेच जून २०२४ पासून दर्जावाढ देऊ, असे आश्वासन दिले; पण वेतनश्रेणीच्या प्रश्नास बगल दिली.शासनाने ग्रंथालयीन चळवळ जिवंत ठेवण्यासाठी वरील सर्व प्रश्न

तातडीने सोडवावेत अशी मागणी किनवट तालुका ग्रंथालय  संघाचे अध्यक्ष ॲड.मिलिंद सर्पे व सचिव प्रा . दगडू भरकड यांनी शासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

● ग्रंथालयाला शासनाने साठ टक्के अनुदानवाढ दिली. मात्र, चाळीस टक्के मागील तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. नवीन ग्रंथालयांना मान्यता नाही व दर्जावाढ अद्याप बंद आहे. येत्या नऊ मार्चला हदगाव येथे ग्रंथालय संघाचे अधिवेशन आहे. किनवट व माहूर तालुक्यातील सर्व ग्रंथालयचालकांनी या अधिवेशनास उपस्थित राहावे.

उध्दव रामतिर्थकर, कार्याध्यक्ष किनवट तालुका ग्रंथालय संघ, किनवट 

-------------------------------------------------------•

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...