Skip to main content

विषमतावादी व्यवस्थे विरोधात बहुजनांनी एकत्रितपणे लढा देणे काळाची गरज -सक्षणा सलगर

 


किनवटः विषमतावादी व्यवस्थेचे लोक सत्तेत गेल्यामुळे दलित शोषित पीडित समाजात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. सोमनाथ सूर्यवंशी, संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्या हे अलीकडच्या काळातील ज्वलंत उदाहरणे आहेत समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्यायाची व्यवस्था टिकवायची असेल तर भारतीय संविधान वाचविण्यासाठी बहुजनानी एकत्रित लढा देणे काळाची गरज बनली आहे असे मौलिक प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर यांनी किनवट येथे केले आहे.


किनवट येथील समता नगर येथे 9 फेब्रुवारी रोजी आयोजित 14 व्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेतील समारोपीय सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून सक्षणाताई सलगर बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार विजयराव खडसे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून धनंजय सोळंके किनवटचे माजी नगराध्यक्ष साजिद खान प्राध्यापक राम भरणे राज बनकर विकास कुडमेथे बालाजी बामणे निमंत्रक निखिल वाघमारे यांची प्रामुख्याने पस्थिती होती.

पुढे बोलताना सलगर म्हणाल्या की विषमतावादी व्यवस्थेचे लोक सत्तेत गेल्यापासून दलित शोषित पडितावर अन्यायाचे सत्र सुरू झाले. सोमनाथ सूर्यवंशी व संतोष देशमुख यांच्या हत्या इथल्या विषमतावादी व्यवस्थेने घडून आणल्या या देशात सामाजिक एकोपा स्वातंत्र्य बंधुता व न्याय टिकून ठेवायचा असेल तर भारतीय संविधान वाचविणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी बहुजनांनी एकत्रितपणे लढा उभारणे काळाची गरज बनली आहे. धम्म परिषदा सामाजिक चळवळीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे स्पष्ट करत गेल्या 14 वर्षापासून किनवट सारख्या मागास दुर्गम भागात भव्य दिव्य अशा धम्म परिषदांच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक राहुल कापसे व त्यांच्या सहकाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले, महाराष्ट्रला शाहू फुले आंबेडकर अहिल्याचा वारसा लाभला आहे. त्यामुळे येथे जातीपातीला मुळीच थारा नाही. धम्म परिषदेतुन तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रखर विचारांचं प्रतिबिंब दिसतं असेही सक्षनाताई सलगर म्हणाल्या. या धम्म परिषदेला मराठवाडा विदर्भ व तेलंगणा राज्यातून हजारो बौद्ध अनुयायी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.