Skip to main content

विषमतावादी व्यवस्थे विरोधात बहुजनांनी एकत्रितपणे लढा देणे काळाची गरज -सक्षणा सलगर

 


किनवटः विषमतावादी व्यवस्थेचे लोक सत्तेत गेल्यामुळे दलित शोषित पीडित समाजात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. सोमनाथ सूर्यवंशी, संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्या हे अलीकडच्या काळातील ज्वलंत उदाहरणे आहेत समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्यायाची व्यवस्था टिकवायची असेल तर भारतीय संविधान वाचविण्यासाठी बहुजनानी एकत्रित लढा देणे काळाची गरज बनली आहे असे मौलिक प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर यांनी किनवट येथे केले आहे.


किनवट येथील समता नगर येथे 9 फेब्रुवारी रोजी आयोजित 14 व्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेतील समारोपीय सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून सक्षणाताई सलगर बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार विजयराव खडसे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून धनंजय सोळंके किनवटचे माजी नगराध्यक्ष साजिद खान प्राध्यापक राम भरणे राज बनकर विकास कुडमेथे बालाजी बामणे निमंत्रक निखिल वाघमारे यांची प्रामुख्याने पस्थिती होती.

पुढे बोलताना सलगर म्हणाल्या की विषमतावादी व्यवस्थेचे लोक सत्तेत गेल्यापासून दलित शोषित पडितावर अन्यायाचे सत्र सुरू झाले. सोमनाथ सूर्यवंशी व संतोष देशमुख यांच्या हत्या इथल्या विषमतावादी व्यवस्थेने घडून आणल्या या देशात सामाजिक एकोपा स्वातंत्र्य बंधुता व न्याय टिकून ठेवायचा असेल तर भारतीय संविधान वाचविणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी बहुजनांनी एकत्रितपणे लढा उभारणे काळाची गरज बनली आहे. धम्म परिषदा सामाजिक चळवळीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे स्पष्ट करत गेल्या 14 वर्षापासून किनवट सारख्या मागास दुर्गम भागात भव्य दिव्य अशा धम्म परिषदांच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक राहुल कापसे व त्यांच्या सहकाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले, महाराष्ट्रला शाहू फुले आंबेडकर अहिल्याचा वारसा लाभला आहे. त्यामुळे येथे जातीपातीला मुळीच थारा नाही. धम्म परिषदेतुन तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रखर विचारांचं प्रतिबिंब दिसतं असेही सक्षनाताई सलगर म्हणाल्या. या धम्म परिषदेला मराठवाडा विदर्भ व तेलंगणा राज्यातून हजारो बौद्ध अनुयायी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...