किनवट (तालुका प्रतिनिधी) सुलतानी व आसमानी संकटाचं वजन पेलत असताना किनवट तालुक्यातील लक्कडकोट गट ग्रामपंचायत मारेगाव खालचे येथील शेतकरी रानटी प्राण्यां कडून पीक नासाडी करत असल्यामुळे मयत अंकुश बाळू हसबे वय 55 दिनांक 9/2/ 2025 रोजी संध्याकाळी साडेसात ते आठ वाजता पिकाचे संरक्षण करण्यासाठी रानटी प्राण्यापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतात गेला असता सदर शेतामध्ये पोहोचल्याच्या नंतर दोन रान डुकराने अचानकपणे हल्ला केला हल्ला एवढा गंभीर स्वरूपाचा होता की शेतकरी गंभीर दुखापत होऊन त्याला लगेच गावकरी मंडळीने खाजगी वाहनांमध्ये टाकून गोकुंदा येथे नेण्यात आले गोकुंदा येथे डॉक्टरांनी गंभीर दुखापत असल्यामुळे त्याला आदिलाबादच्या सरकारी रुग्णाला रेफर करण्यात आले दिना आदीलाबाद येथील सरकारी रुग्णालयात पोहोचले असता तिथे डॉक्टरांनी मृत घोषित त्यांना केले त्यांचा अंत्यविधी आज दिनांक 10 /2/ 2025 रोजी संध्याकाळी चार वाजता तमाम मारेगाव व लक्कडकोट व तसेच परिसरातील नागरिकांच्या हजरी मध्ये पार झाला सर्वच नागरिकांच्या मनावर एक दुःखाचे सावट होते शेतकऱ्याला अशा अनेक संकटाला तोंड द्यावं लागत आहे त्यामुळे शासनाने या बाबीकडे गंभीर दखल घेऊन शेतकऱ्याच्या वारसाला शासकीय मदत लवकरात लवकर देण्यात यावी असे मत नागरिकांनी व्यक्त केले त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी त्यांच्या दोन मुली व दोन मुले असा परिवार आहे..

Comments
Post a Comment