Skip to main content

बहारदार रचनेने बळीराम पाटील महाविद्यालयात कविसंमेलन संपन्न

 


स्वच्छंद पाखरांनी आभाळ पांघरावे

हिरव्या मनामनाला धरणीने मोहरावे

ओल्या निळ्या नभाने शिंपावे माणिक मोती

कृतार्थ वंसुधरेने झेलावे छातीवरती...


किनवट ता. प्रतिनिधी:


बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय किनवट येथे मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने सामाजिक जाणिवेचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्राचार्य 

डॉ.एस.के.बेंबरेकर , प्रसिद्ध कवी नंदन नांगरे, डॉ.प्रकाश मोगले, वंदना तामगाडगे,रमेश मुनेश्वर, राजेश पाटील, यांनी बहारदार रंचना सादर केले.प्रारंभी थोर समाजसुधारक स्मृतीशेष बळीराम पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख तथा उपप्राचार्य डॉ.पंजाब शेरे यांनी केले.

नंदन नांगरे यांनी आपली रचना सादर करतांना म्हणाले आपल्या माणंसासी एक निष्ठ राहा

स्वच्छंद पाखरांनी आभाळ पांघरावे.

हिरव्या मनामनाला धरणीने मोहरावे.

ओल्या निळ्या नभाने शिंपावे माणिक - मोती 

कृतार्थ वसुंधरेने झेलावे छातीवरती 

मातीच्या गंध फुलांनी वाऱ्यावर मस्त झुलावे.


बाई मी दयन दईता 

गाते भीमाची व गाणी 

भीम झाला आमचा नेता 

गेली जळून गुलामी 

अशा रंचना सादर केले.या प्रसंगी प्रकाश मोगले यांनी रंचना सादर केले.

कवी रमेश मुनेश्वर यांनी कविता सादर करतांना म्हणाले 


उठा युवकांनो तुम्ही

भविष्याकडे बघा

सुंदर हे जीवन आपले

तीला तुम्ही जगा...

संविधान घ्या हाती

लढा तुम्ही न्यायासाठी

आधारस्तंभ या देशाचे

नव्याने तुम्ही घडवा...


'आई माय जननी

अनेक शब्दात तू ..

माझ्या शरिरातील

नसानसात तू ..

तुझी सर कुणा येईल 

सांग ना !

तुच दिलेला श्वास

हृदयात ना !!'

तर कवी राजेश पाटील यांनी

जोडीण निघाले जोती अन सावीत्री 

जोडीण निघाले जोती अन सावीत्री 

 झाली हो माझी शिक्षणाशी मैत्री

 झाली हो माझी शिक्षणाशी मैत्री

त्या लिबांच्या झाडाखाली सावली होती

 तेंव्हाच तु मला !!!!!!! 

ही तरुणाईच्या मनाचा ठाव घेणारी रचना सादर केली.

या नंतर कवयत्री वंदना तामगाडगे

यांनी स्त्रीवादी कविता सादर केल्या

माझा जन्म झाला तेंव्हा 

आई वडील हिरमुसले

मुलगी का झाली

हेच कारण सर्वांनी पुसले

व 

सुंदर जिवन जगण्यासाठी

दुर्जन संगत धरु नका

उगाच मानापानासाठी

रात्रंदिवस झुरु नका या रचना सादर करून उपस्थितांची दाद मिळविले.

अध्यक्षीय समारोप डॉ.आनंद भालेराव, सूत्रसंचालन प्रा प्रल्हाद जाधव आभार प्रा.दयानंद वाघमारे यांनी केले.या प्रसंगी प्रा.ममता जोनपेलीवार, ग्रंथपाल मंदाकिनी राठोड, डॉ.प्रज्ञा घोडवाडीकर, डॉ.शुंभागी दिवे,प्रा आम्रपाली हटकर,डॉ.सुलोचना जाधव, डॉ स्वाती कुरमे, डॉ.रचना हिपळगावकर,

प्रा.सुभाष काळे,प्रा.सतीश मिराशे, उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...