Skip to main content

बहारदार रचनेने बळीराम पाटील महाविद्यालयात कविसंमेलन संपन्न

 


स्वच्छंद पाखरांनी आभाळ पांघरावे

हिरव्या मनामनाला धरणीने मोहरावे

ओल्या निळ्या नभाने शिंपावे माणिक मोती

कृतार्थ वंसुधरेने झेलावे छातीवरती...


किनवट ता. प्रतिनिधी:


बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय किनवट येथे मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने सामाजिक जाणिवेचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्राचार्य 

डॉ.एस.के.बेंबरेकर , प्रसिद्ध कवी नंदन नांगरे, डॉ.प्रकाश मोगले, वंदना तामगाडगे,रमेश मुनेश्वर, राजेश पाटील, यांनी बहारदार रंचना सादर केले.प्रारंभी थोर समाजसुधारक स्मृतीशेष बळीराम पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख तथा उपप्राचार्य डॉ.पंजाब शेरे यांनी केले.

नंदन नांगरे यांनी आपली रचना सादर करतांना म्हणाले आपल्या माणंसासी एक निष्ठ राहा

स्वच्छंद पाखरांनी आभाळ पांघरावे.

हिरव्या मनामनाला धरणीने मोहरावे.

ओल्या निळ्या नभाने शिंपावे माणिक - मोती 

कृतार्थ वसुंधरेने झेलावे छातीवरती 

मातीच्या गंध फुलांनी वाऱ्यावर मस्त झुलावे.


बाई मी दयन दईता 

गाते भीमाची व गाणी 

भीम झाला आमचा नेता 

गेली जळून गुलामी 

अशा रंचना सादर केले.या प्रसंगी प्रकाश मोगले यांनी रंचना सादर केले.

कवी रमेश मुनेश्वर यांनी कविता सादर करतांना म्हणाले 


उठा युवकांनो तुम्ही

भविष्याकडे बघा

सुंदर हे जीवन आपले

तीला तुम्ही जगा...

संविधान घ्या हाती

लढा तुम्ही न्यायासाठी

आधारस्तंभ या देशाचे

नव्याने तुम्ही घडवा...


'आई माय जननी

अनेक शब्दात तू ..

माझ्या शरिरातील

नसानसात तू ..

तुझी सर कुणा येईल 

सांग ना !

तुच दिलेला श्वास

हृदयात ना !!'

तर कवी राजेश पाटील यांनी

जोडीण निघाले जोती अन सावीत्री 

जोडीण निघाले जोती अन सावीत्री 

 झाली हो माझी शिक्षणाशी मैत्री

 झाली हो माझी शिक्षणाशी मैत्री

त्या लिबांच्या झाडाखाली सावली होती

 तेंव्हाच तु मला !!!!!!! 

ही तरुणाईच्या मनाचा ठाव घेणारी रचना सादर केली.

या नंतर कवयत्री वंदना तामगाडगे

यांनी स्त्रीवादी कविता सादर केल्या

माझा जन्म झाला तेंव्हा 

आई वडील हिरमुसले

मुलगी का झाली

हेच कारण सर्वांनी पुसले

व 

सुंदर जिवन जगण्यासाठी

दुर्जन संगत धरु नका

उगाच मानापानासाठी

रात्रंदिवस झुरु नका या रचना सादर करून उपस्थितांची दाद मिळविले.

अध्यक्षीय समारोप डॉ.आनंद भालेराव, सूत्रसंचालन प्रा प्रल्हाद जाधव आभार प्रा.दयानंद वाघमारे यांनी केले.या प्रसंगी प्रा.ममता जोनपेलीवार, ग्रंथपाल मंदाकिनी राठोड, डॉ.प्रज्ञा घोडवाडीकर, डॉ.शुंभागी दिवे,प्रा आम्रपाली हटकर,डॉ.सुलोचना जाधव, डॉ स्वाती कुरमे, डॉ.रचना हिपळगावकर,

प्रा.सुभाष काळे,प्रा.सतीश मिराशे, उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...