Skip to main content

परभणी घटनेच्या निषेधार्थ किनवट मध्ये कडकडीत बंद




किनवट,ता.१६ : सर्व पक्षीय आंबेडकरवादी व संविधानप्रेमी कृती समितीच्या वतीने आज(दि.१६) दिलेल्या किनवट बंदच्या हाकेला १०० टक्के

प्रतिसाद  मिळाला.

  कृती समितीच्या वतीने दुपारी १२ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून मोर्चा काढण्यात आला.शहरातील प्रमुख मार्गाने फिरुन मोर्चा तहसील कार्यालयावर पोहचला.एका शिष्टमंडळाने तहसीलदार यांना निवेदन सादर केले.निवेदनात नमुद केले आहे की,परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मुख्य आरोपीना तात्काळ अटक करून परभणीतील कायदा व सुव्यवस्था स्थिती हाताळण्यात अपशयी ठरलेल्या पोलीस अधिका-यावर निलंबनाची कारवाई करा.

   परभरणी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची काही जातीयवादी समाजकंटाकडुन  १० डिसेंबर रोजी तोडफोड करून विटंबना करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ परभणीतील आंबेडकरी समुदायाने  १२ डिसेंबर रोजी बंदची हाक दिली होती. या बंदच्या काळात कायदा व सुव्यवस्था स्थिती आबाधीत राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची जबाबदारी परभणी पोलीसांची होती. परंतु, परभणी पोलीसांनी आवश्यक ती खबरदारी न घेतल्यामुळे परिस्थिती चिघळली आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. या परिस्थीतीला परभणीचे पोलीसच पूर्णतः जबाबदार असतांना मात्र त्यासाठी आंबेडकरी समुदयांला जबाबदार धरून त्यांच्यावर पोलीसाकडून अन्याय- अत्याचार करण्यात येत आहेत. पोलीसांच्या या दंडेलशाहीचा आम्ही किनवट तालूक्यातील सर्वपक्षीय आंबेडकरवादी आणि संविधानप्रेमी नेते, कार्यकर्ते व नागरीक जाहिर निषेध करतो,असे नमुद केले आहे. 

  परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करुन विटंबना करणाऱ्या मुख्यसुत्रधाराचा तात्काळ शोध घेऊन त्यांना बेड्या ठोका आणि या विटंबना प्रकरणातील आरोपीविरुध्व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरी कार्यकत्याचा न्यायालयीन कोठडीत १५ डिसेंबर  रोजी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस जबाबदार धरुन पोलिस निरीक्षक अशोक घोरखंड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरी कार्यकत्याच्या कुटुंबीयाना शासकिय निधीतुन ५० लाख रुपये मदत द्या,निष्पाप आंबेडकरी नागरीक विशेषतः तरुणावर एफआयआर दाखल करून त्यांना अमानुष मारहाण करण्यासाठी नियोजनबध्दरितीने राबविण्यात येणारे परभणी येथील पोलीसांचे कोबिंग ऑपरेशन तात्काळ थांबवा,परभणीतील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यास अपयशी ठरलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चीत करुन त्यांना निलंबीत करा आणि त्यांची विभागीय चौकशी करि,१२ डिसेंबर रोजी परभणी येथील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती हाताबाहेर जाण्यास पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड ही जबाबदार असून त्यांनाही या प्रकरणात सहआरोपी करून त्यांना तात्काळ निलंबीत करा,अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

    निवेदनावर  दादाराव कयापाक रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया, मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष,विनोद भरणे पीपल्स रिपलब्लीन पार्टी, नांदेड जिल्हा अध्यक्ष,

अॅड. मिलिंद सर्पे तालूका विधी सेवा समिती सदस्य, अरुण आळणे माजी नगराध्यक्ष,शंकर नगराळे, अध्यक्ष शांती भुमी,

विजय पोलसवार नाभीक महामंडळ महा. प्रदेश कार्यकारीणी सदस्य,प्रविन गायकवाड सामाजिक कार्यकर्ता,विवेक ओंकार तालूका अध्यक्ष, रिपाइं (आठवले),राहुल सर्पे,सामाजिक कार्यकर्ता,निखील दिपक वाघमारे, ता. अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी किनवट ,अॅड. सम्म्राट सर्पे, युवा पॅथर, तालुका अध्यक्ष,मिलिंद कांबळे,निखील कावळे सुगध नगराळे तालूका अध्यक्ष (युवक अध्यक्ष) राष्ट्रवादी अजितपवार गट,दिनेश कांबळे वंचित बहुजन आघाडी ता. उपाध्यक्ष

गंगुबाई परेकार आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.