Skip to main content

ग्रंथालय व माहितीशास्त्रच्या विद्यार्थ्यांची कै.रामतिर्थकर सार्वजनिक ग्रंथालयास क्षेत्रभेट




ग्रंथालय व माहितीशास्त्रच्या विद्यार्थ्यांना कै.रामतिर्थकर सार्वजनिक ग्रंथालयांची माहिती करून देतांना प्राध्यापक व ग्रंथपाल


किनवट,ता.२०( बातमीदार): महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा(ता.किनवट) येथिल ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयाच्या इयत्ता ११  वी आणि १२ वी मध्ये अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुभाष नगरातील  कै.कांताराव रामतीर्थकर सार्वजनिक वाचनालयास  शनिवारी(ता.१९) भेट दिली.महाविद्यालयीन अभ्यासाचा एक भाग म्हणून क्षेत्रभेटीच्या उपक्रमांतर्गत ही शैक्षणिक भेट होती.

   या कार्यक्रमास ग्रंथालय चळवळीतील जेष्ठ  कार्यकर्ते ॲड. मिलिंद सर्पे, वाचनालयाचे अध्यक्ष उद्धवराव रामतीर्थकर, प्रा.सुबोध सर्पे,ग्रंथपाल मयुरी  रामतीर्थकर, ग्रंथालय लिपिक दत्ता हुस्सेकर आधी उपस्थित होते. वाचनालयाच्या वतीने ॲड.मिलिंद सर्पे, प्रा. सुबोध सर्पे तसेच विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून एका विद्यार्थिनीस व एका विद्यार्थ्यास पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.

   सार्वजनिक वाचनालयाची व्यवस्थापन प्रक्रिया समजून घेण्यासाठी सदर भेटीचे आयोजन करण्यात आलेले होते.महाविद्यालयाचे ग्रंथालय आणि माहितीशास्त्र  या विषयाचे प्रा.सुबोध सर्पे यांनी सार्वजनिक वाचनालयाचे महत्त्वाचे दस्तऐवज, मराठी साहित्यामधील विविध पुस्तके, ग्रंथ देवघेव पद्धती, मुक्त प्रवेश पद्धत,बंदिस्त प्रवेश पद्धत, ग्रंथालयाचे प्रकार याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर अशी प्रात्यक्षिक माहिती  दिली. वाचनालयाचे अध्यक्ष उद्धव रामतीर्थकर यावेळी  बोलताना म्हणाले की,विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये पुस्तके  जीवन घडवण्याची काम करतात. सार्वजनिक ग्रंथालये  ही समाजातील लोकांचे निरंतर शिक्षण देणारी विद्यापीठे आहेत.

या क्षेत्रभेटीच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले ॲड. मिलिंद सर्पे यांनी सार्वजनिक ग्रंथालय चळवळ याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमास विद्यालयातील ६० विद्यार्थी उपस्थित होते. या क्षेत्रभेटीतून ज्ञानवर्धक माहिती आम्हास मिळाली अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. ग्रंथपाल मयुरी रामतीर्थकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर आभार ग्रंथालय लिपिक दत्ता हुस्सेकर यांनी मानले.


Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.