Skip to main content

ग्रंथालय व माहितीशास्त्रच्या विद्यार्थ्यांची कै.रामतिर्थकर सार्वजनिक ग्रंथालयास क्षेत्रभेट




ग्रंथालय व माहितीशास्त्रच्या विद्यार्थ्यांना कै.रामतिर्थकर सार्वजनिक ग्रंथालयांची माहिती करून देतांना प्राध्यापक व ग्रंथपाल


किनवट,ता.२०( बातमीदार): महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा(ता.किनवट) येथिल ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयाच्या इयत्ता ११  वी आणि १२ वी मध्ये अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुभाष नगरातील  कै.कांताराव रामतीर्थकर सार्वजनिक वाचनालयास  शनिवारी(ता.१९) भेट दिली.महाविद्यालयीन अभ्यासाचा एक भाग म्हणून क्षेत्रभेटीच्या उपक्रमांतर्गत ही शैक्षणिक भेट होती.

   या कार्यक्रमास ग्रंथालय चळवळीतील जेष्ठ  कार्यकर्ते ॲड. मिलिंद सर्पे, वाचनालयाचे अध्यक्ष उद्धवराव रामतीर्थकर, प्रा.सुबोध सर्पे,ग्रंथपाल मयुरी  रामतीर्थकर, ग्रंथालय लिपिक दत्ता हुस्सेकर आधी उपस्थित होते. वाचनालयाच्या वतीने ॲड.मिलिंद सर्पे, प्रा. सुबोध सर्पे तसेच विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून एका विद्यार्थिनीस व एका विद्यार्थ्यास पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.

   सार्वजनिक वाचनालयाची व्यवस्थापन प्रक्रिया समजून घेण्यासाठी सदर भेटीचे आयोजन करण्यात आलेले होते.महाविद्यालयाचे ग्रंथालय आणि माहितीशास्त्र  या विषयाचे प्रा.सुबोध सर्पे यांनी सार्वजनिक वाचनालयाचे महत्त्वाचे दस्तऐवज, मराठी साहित्यामधील विविध पुस्तके, ग्रंथ देवघेव पद्धती, मुक्त प्रवेश पद्धत,बंदिस्त प्रवेश पद्धत, ग्रंथालयाचे प्रकार याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर अशी प्रात्यक्षिक माहिती  दिली. वाचनालयाचे अध्यक्ष उद्धव रामतीर्थकर यावेळी  बोलताना म्हणाले की,विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये पुस्तके  जीवन घडवण्याची काम करतात. सार्वजनिक ग्रंथालये  ही समाजातील लोकांचे निरंतर शिक्षण देणारी विद्यापीठे आहेत.

या क्षेत्रभेटीच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले ॲड. मिलिंद सर्पे यांनी सार्वजनिक ग्रंथालय चळवळ याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमास विद्यालयातील ६० विद्यार्थी उपस्थित होते. या क्षेत्रभेटीतून ज्ञानवर्धक माहिती आम्हास मिळाली अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. ग्रंथपाल मयुरी रामतीर्थकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर आभार ग्रंथालय लिपिक दत्ता हुस्सेकर यांनी मानले.


Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...