Skip to main content

राजर्षी शाहू नगर गोकुंदा येथील सम्राट अशोक बुद्ध विहारात बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा वाचन समारोप

 


किनवट:      भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा किनवट च्या वतीने आयोजित गोकुंदा येथील सम्राट अशोक बुद्ध विहार राजर्षी शाहु नगर येथे दि.२०ॲाक्टोबर  रोजी वर्षावास कार्यक्रमाचा समारोप  करण्यात आला.  भारतीय बौध्द महासभेचे तालुका अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात  भारतीय बौध्द महासभेचे संस्कार उपाध्यक्ष प्रा.सुभाष गडलिंग सर यांनी   आपल्या गोड वाणीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित "बुद्ध आणि त्याचा धम्म " या ग्रंथाचे वाचन करून विविध  विषयांवर  सुबोध मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन अध्यक्ष अभियंता प्रशांतजी ठमके यांनी सत्कार केला. प्रारंभी भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार सचिव बौध्दाचार्य अनिल उमरे यांनी त्रिशरण  पंचशील दिले. तीन महिन्यात आम्ही काय श्रवण केले, काय समजले यावर,   उपासिका वंदना बागेश्वर, आदर्श शिक्षक सुरेश पाटील यांच्या सह अनेक श्रोत्यांनी मनोगत व्यक्त केले, यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी.प्रा.अन्ना मुन,प्रा डॉ.उत्तम शेंडे,प्रा.संघरत्ना आठवले ,प्रा.रेखाताई मुन यांनी ही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, बंडू भाटशंकर  यांनी केले तर विनय वैरागडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.याप्रसंगी असंख्य बौद्ध उपासक उपासिका यांची उपस्थिती होती.सरनतय गाथेनतर उपस्थितांना भोजनदान करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...