Skip to main content

हेमंत पाटील यांना एका महिन्यात दुसऱ्यांदा लॉटरी

 


हिंगोली- बाळासाहेब ठाकरे हळद प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्षपदी राहण्याबरोबरच आता त्यांना आमदार होण्याची संधी मिळाल्याने दुसऱ्यांदा लॉटरी लागली आहे.

हिंगोली लोकसभेसाठी त्यांना नाकारताच त्यांच्या पत्नीना राजश्री पाटील यांना वाशीम यवतमाळ लोकसभेची उमेदवारी दिली मात्र त्यात पराभव झाला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर हेमंत पाटील यांना बाळासाहेब ठाकरे हळद प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षपदावरून पाटील यांना राज्यमंत्रीपद बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाटील यांना राज्यमंत्रिपद देऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी पाटील यांचे राजकीय पुनर्वसन केले. राज्यमंत्री म्हणून जाहीर झाल्यानंतर महिनाभरातच पाटील यांची राज्यपाल नियुक्त विधान

परिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे. याचाच अर्थ पाटील यांना एका महिन्यात दुहेरी लॉटरी लागली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हेमंत पाटील हे हिंगोली लोकसभा मतदारसंघातून प्रचंड

मतांनी विजयी झाले. पाटील यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात अनेक विकासकामे केली. त्यांची लोकप्रियता लक्षात घेऊन काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना शिवसेनेकडून

(शिंदे गट) उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र स्थानिक भाजप नेत्यांनी पाटील यांच्या नावाला कडाडून विरोध केला. याच सर्वेक्षणात पाटील यांच्या पडझडीची खोटी माहिती वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्यात आली. त्यामुळेच उमेदवारी अर्ज दाखल करताना हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबुराव पाटील कोहलीकर यांना रिंगणात उतरवण्यात आले. मात्र या निवडणुकीत बाबूराव पाटील यांचा पराभव झाला. हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना शेजारच्या वाशिम-यवतमाळ मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र तेथेही राजश्री पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तेथे भावना गवळी यांचे तिकीट रद्द करून राजश्री पाटील यांना रिंगणात उतरवले. लोकसभा निवडणुकीनंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना समजले की, हिंगोली, वाशिम यवतमाळसारख्या जागा गमावल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आधी माजी खासदार भावना गवळी यांना विधान परिषदेवर पाठवून त्यांचे पुनर्वसन केले. त्यानंतर हेमंत पाटील यांचेही पुनर्वसन करण्यात आले.

पाटील यांनी एकाच महिन्यात दुहेरी लॉटरी जिंकल्याने त्यांना विरोध करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून पाटील यांना विधान परिषदेत जागा मिळणार असल्याची चर्चा होती. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सोमवार, १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत पाटील यांचा समावेश करण्यात आला. पाटील यांची बाळासाहेब ठाकरे हळद प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षपदी वर्णी लागल्याने पाटील समर्थकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...