Skip to main content

हेमंत पाटील यांना एका महिन्यात दुसऱ्यांदा लॉटरी

 


हिंगोली- बाळासाहेब ठाकरे हळद प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्षपदी राहण्याबरोबरच आता त्यांना आमदार होण्याची संधी मिळाल्याने दुसऱ्यांदा लॉटरी लागली आहे.

हिंगोली लोकसभेसाठी त्यांना नाकारताच त्यांच्या पत्नीना राजश्री पाटील यांना वाशीम यवतमाळ लोकसभेची उमेदवारी दिली मात्र त्यात पराभव झाला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर हेमंत पाटील यांना बाळासाहेब ठाकरे हळद प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षपदावरून पाटील यांना राज्यमंत्रीपद बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाटील यांना राज्यमंत्रिपद देऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी पाटील यांचे राजकीय पुनर्वसन केले. राज्यमंत्री म्हणून जाहीर झाल्यानंतर महिनाभरातच पाटील यांची राज्यपाल नियुक्त विधान

परिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे. याचाच अर्थ पाटील यांना एका महिन्यात दुहेरी लॉटरी लागली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हेमंत पाटील हे हिंगोली लोकसभा मतदारसंघातून प्रचंड

मतांनी विजयी झाले. पाटील यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात अनेक विकासकामे केली. त्यांची लोकप्रियता लक्षात घेऊन काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना शिवसेनेकडून

(शिंदे गट) उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र स्थानिक भाजप नेत्यांनी पाटील यांच्या नावाला कडाडून विरोध केला. याच सर्वेक्षणात पाटील यांच्या पडझडीची खोटी माहिती वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्यात आली. त्यामुळेच उमेदवारी अर्ज दाखल करताना हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबुराव पाटील कोहलीकर यांना रिंगणात उतरवण्यात आले. मात्र या निवडणुकीत बाबूराव पाटील यांचा पराभव झाला. हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना शेजारच्या वाशिम-यवतमाळ मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र तेथेही राजश्री पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तेथे भावना गवळी यांचे तिकीट रद्द करून राजश्री पाटील यांना रिंगणात उतरवले. लोकसभा निवडणुकीनंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना समजले की, हिंगोली, वाशिम यवतमाळसारख्या जागा गमावल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आधी माजी खासदार भावना गवळी यांना विधान परिषदेवर पाठवून त्यांचे पुनर्वसन केले. त्यानंतर हेमंत पाटील यांचेही पुनर्वसन करण्यात आले.

पाटील यांनी एकाच महिन्यात दुहेरी लॉटरी जिंकल्याने त्यांना विरोध करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून पाटील यांना विधान परिषदेत जागा मिळणार असल्याची चर्चा होती. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सोमवार, १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत पाटील यांचा समावेश करण्यात आला. पाटील यांची बाळासाहेब ठाकरे हळद प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षपदी वर्णी लागल्याने पाटील समर्थकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला