Skip to main content

हेमंत पाटील यांना एका महिन्यात दुसऱ्यांदा लॉटरी

 


हिंगोली- बाळासाहेब ठाकरे हळद प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्षपदी राहण्याबरोबरच आता त्यांना आमदार होण्याची संधी मिळाल्याने दुसऱ्यांदा लॉटरी लागली आहे.

हिंगोली लोकसभेसाठी त्यांना नाकारताच त्यांच्या पत्नीना राजश्री पाटील यांना वाशीम यवतमाळ लोकसभेची उमेदवारी दिली मात्र त्यात पराभव झाला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर हेमंत पाटील यांना बाळासाहेब ठाकरे हळद प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षपदावरून पाटील यांना राज्यमंत्रीपद बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाटील यांना राज्यमंत्रिपद देऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी पाटील यांचे राजकीय पुनर्वसन केले. राज्यमंत्री म्हणून जाहीर झाल्यानंतर महिनाभरातच पाटील यांची राज्यपाल नियुक्त विधान

परिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे. याचाच अर्थ पाटील यांना एका महिन्यात दुहेरी लॉटरी लागली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हेमंत पाटील हे हिंगोली लोकसभा मतदारसंघातून प्रचंड

मतांनी विजयी झाले. पाटील यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात अनेक विकासकामे केली. त्यांची लोकप्रियता लक्षात घेऊन काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना शिवसेनेकडून

(शिंदे गट) उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र स्थानिक भाजप नेत्यांनी पाटील यांच्या नावाला कडाडून विरोध केला. याच सर्वेक्षणात पाटील यांच्या पडझडीची खोटी माहिती वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्यात आली. त्यामुळेच उमेदवारी अर्ज दाखल करताना हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबुराव पाटील कोहलीकर यांना रिंगणात उतरवण्यात आले. मात्र या निवडणुकीत बाबूराव पाटील यांचा पराभव झाला. हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना शेजारच्या वाशिम-यवतमाळ मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र तेथेही राजश्री पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तेथे भावना गवळी यांचे तिकीट रद्द करून राजश्री पाटील यांना रिंगणात उतरवले. लोकसभा निवडणुकीनंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना समजले की, हिंगोली, वाशिम यवतमाळसारख्या जागा गमावल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आधी माजी खासदार भावना गवळी यांना विधान परिषदेवर पाठवून त्यांचे पुनर्वसन केले. त्यानंतर हेमंत पाटील यांचेही पुनर्वसन करण्यात आले.

पाटील यांनी एकाच महिन्यात दुहेरी लॉटरी जिंकल्याने त्यांना विरोध करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून पाटील यांना विधान परिषदेत जागा मिळणार असल्याची चर्चा होती. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सोमवार, १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत पाटील यांचा समावेश करण्यात आला. पाटील यांची बाळासाहेब ठाकरे हळद प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षपदी वर्णी लागल्याने पाटील समर्थकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.