किनवट प्रतिनिधी:-
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर व जेतवन बुद्ध विहार , सिद्धार्थ नगर , गोकुंदा अंगणवाडी परीसर आणि विविध ठिकाणी अशोक विजया दशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिवस हर्षोल्हासात साजरा करण्यात आला .
डॉ. आबेंडकर पुतळा परीसर येथे माजी प्राचार्य उपा.राजाराम वाघमारे यांच्या हस्ते पंचशिल ध्वजारोहण तर जेतवन बुद्ध विहार येथे उपासक गंगाधर कावळे यांच्या हस्ते करण्यात आले तर धम्म वंदना बौद्धाचार्य महेंद्र नरवाडे, अनिल उमरे यांनी घेतली सुत्र संचालन उत्तम कानिंदे यांनी केले .
यावेळी अनिल महामुने,यादव नगारे, डॉ. पंजाब शेरे, पंडीत घुले, चांगदेव सोनुले, पाटील सर, साळवे साहेब, किशनराव ठमके, आत्मानंद सत्यवंश, विवेक ओंकार, सुरेश कावळे, आनंद नगारे, शिलरत्न पाटील,मनोहर पाटील, बालकिशन कांबळे, भिमराव गिमेकार, माधव कावळे, माधव नगारे, ॲड. मिलींद सर्पे, राजेश पाटील, रवी कांबळे नवयुवक मंडळाचे निखील कावळे, आकाश सर्पे, आनंद कावळे, रोहीत मुनेश्वर, सुगत नगराळे, प्रसेनजीत कावळे, गौतम पाटील, प्रशिक मुनेश्वर तथा विशाखा महिला मंडळाच्या कौशल्या मुनेश्वर, जयमाला आळणे, मालाबाई नगारे, सागर नगारे, सारजाबाई कावळे, राहीबाई पाटील, विश्रांताबाई धोटे, मैनाबाई पाटील, संगिता पाटील, कापुरे ताई, आम्रपाली कावळे, सविता भरणे, सिमा पाटील, ललीता मुनेश्वर, सिंधुबाई कांबळे, सोमीत्रा कावळे, सोनुलेबाई, आम्रपाली वाठोरे, अनुश्री आळणे, हर्षवर्धना पाटील, वसुंधरा सत्यवंश, पल्लवी कावळे, रुपाली कावळे तथा असंख्य महिला व बाल बालके उपस्थित होते.
Comments
Post a Comment