नांदेड प्रतिनिधी:-
नांदेड येथील प्रसिद्ध कवयित्री तथा लेखिका सौ. रुचीरा बेटकर सह शिक्षिके सोबत साहित्य क्षेत्रात सुद्धा काम करतात त्यांच्याच कामाची पोहच पावती म्हणून कोल्हापूर येथील १९ व्या संमेलनात 'शब्दकुंज प्रेरणा पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले.
कवि सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित कोल्हापूर येथे १९ व्या राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात 'शब्दकुंज प्रेरणा पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.
सदरचा पुरस्कार डॉ. श्रीकांत पाटील प्रसिद्ध कांदबरीकार यांचे हस्ते आणि संमेलन अध्यक्ष प्रा. पी. एस. पाटील, डॉ रामचंद्र चोथे दादासाहेब शेख ' भाऊसाहेब कांबळे अशोक मोहिते, शैलजा परमणे प्रा. संतोष जोईल, सुशिल डवर आणि संमेलन आयोजक कवि सरकार इंगळी यांच्या उपस्थीत २९ सप्टेंबर २४ रोजी देऊन सन्मानीत करण्यात आले या बद्दल नांदेड येथील साहित्यिक मंडळी कवीकट्टा, अक्षरोदय साहित्य मंडळ, कॉमेडी कट्टा व नांदेड जिल्ह्यातील साहित्यीक मंडळींनी अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment