Skip to main content

आपली भाषा हि काळजात रुजणारी भाषा असते- प्रा. डॉ. तपन कुमार मिश्रा

 


नांदेड: प्रतिनिधी

श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित हिंदी विभाग यशवंत महाविद्यालय नांदेड येथे हिंदी दिवसाचे औचित्य साधून पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले होते.

ज्या मध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे कौशल्य दाखवले व सहभाग घेतला या पंधरवाडयाचा समारोप हिंदी दिवस व हिंदी साहित्य परिषदच्या उद्घाटनाने झाला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा उद्घाटक म्हणून सरस्वती विद्या मंदिर महाविद्यालय किनवटचे प्राध्यापक डॉ. तपन कुमार मिश्रा हे उपस्थित होते.



आपल्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी भाषा उत्पत्ती पासून ते भाषा हि काळाजात रुजलेली भाषा आहे असे प्रतिपादन त्यांनी केले जी की सर्व भारताला जोडण्याच काम करते भारतीय परंपरा भाषा यांचा संयोग कसा आहे ते समजावून सांगितले तथा सर्वेश्वर दयाल सक्सेना यांची रचना जब भी भुख से लडने कोई खडा हो जाता है सुंदर दिखने लगता है! या कवितेने समारोप केला तर अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे उपप्राचार्या कविता सोनकांबळे यांनी महाराष्ट्रात हिंदी भाषा अधिक बोलल्या जाते अटल बिहारी वाजपेयी यांची कविता उम्र की ऐसी की तैसी या माध्यमातून हिंदी भाषेबद्दल प्रेम व्यक्त केले .

कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या तरंग या भितीपत्रकाद्वारे केली कु. कोमल कागदेवाड, पुनम अंबोरे, वैष्णवी मंदेवाड यांना स्वागत गीत सादर केले हिंदी विभाग अध्यक्ष प्रा.डॉ.संदीप पाईकराव हिंदी विभागात चालणाऱ्या  गतीविधी बद्दल माहिती दिली.

हिंदी साहित्य परिषद बद्दल डॉ.सुनिल जाधव यांनी माहिती दिली.

प्रमुख पाहुणे मान्यवरांचा परिचय डॉ. विद्या सावते यांनी करून दिला.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन साईनाथ शाहु यांनी केले तर सुत्र संचालन कु. रितुजा वाडवले कु. प्रीती जमदाडे यांनी केले तर काव्य पाठ कु. कोमल कागदेवाड, कु. शेख फिजा यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिंदी विभागाचे विद्यार्थी तथा महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी प्रयत्न केले या कार्यक्रमास असंख्य विद्यार्थी उपस्थिती होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...