Skip to main content

आपली भाषा हि काळजात रुजणारी भाषा असते- प्रा. डॉ. तपन कुमार मिश्रा

 


नांदेड: प्रतिनिधी

श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित हिंदी विभाग यशवंत महाविद्यालय नांदेड येथे हिंदी दिवसाचे औचित्य साधून पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले होते.

ज्या मध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे कौशल्य दाखवले व सहभाग घेतला या पंधरवाडयाचा समारोप हिंदी दिवस व हिंदी साहित्य परिषदच्या उद्घाटनाने झाला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा उद्घाटक म्हणून सरस्वती विद्या मंदिर महाविद्यालय किनवटचे प्राध्यापक डॉ. तपन कुमार मिश्रा हे उपस्थित होते.



आपल्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी भाषा उत्पत्ती पासून ते भाषा हि काळाजात रुजलेली भाषा आहे असे प्रतिपादन त्यांनी केले जी की सर्व भारताला जोडण्याच काम करते भारतीय परंपरा भाषा यांचा संयोग कसा आहे ते समजावून सांगितले तथा सर्वेश्वर दयाल सक्सेना यांची रचना जब भी भुख से लडने कोई खडा हो जाता है सुंदर दिखने लगता है! या कवितेने समारोप केला तर अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे उपप्राचार्या कविता सोनकांबळे यांनी महाराष्ट्रात हिंदी भाषा अधिक बोलल्या जाते अटल बिहारी वाजपेयी यांची कविता उम्र की ऐसी की तैसी या माध्यमातून हिंदी भाषेबद्दल प्रेम व्यक्त केले .

कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या तरंग या भितीपत्रकाद्वारे केली कु. कोमल कागदेवाड, पुनम अंबोरे, वैष्णवी मंदेवाड यांना स्वागत गीत सादर केले हिंदी विभाग अध्यक्ष प्रा.डॉ.संदीप पाईकराव हिंदी विभागात चालणाऱ्या  गतीविधी बद्दल माहिती दिली.

हिंदी साहित्य परिषद बद्दल डॉ.सुनिल जाधव यांनी माहिती दिली.

प्रमुख पाहुणे मान्यवरांचा परिचय डॉ. विद्या सावते यांनी करून दिला.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन साईनाथ शाहु यांनी केले तर सुत्र संचालन कु. रितुजा वाडवले कु. प्रीती जमदाडे यांनी केले तर काव्य पाठ कु. कोमल कागदेवाड, कु. शेख फिजा यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिंदी विभागाचे विद्यार्थी तथा महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी प्रयत्न केले या कार्यक्रमास असंख्य विद्यार्थी उपस्थिती होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला