नांदेड: प्रतिनिधी
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित हिंदी विभाग यशवंत महाविद्यालय नांदेड येथे हिंदी दिवसाचे औचित्य साधून पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले होते.
ज्या मध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे कौशल्य दाखवले व सहभाग घेतला या पंधरवाडयाचा समारोप हिंदी दिवस व हिंदी साहित्य परिषदच्या उद्घाटनाने झाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा उद्घाटक म्हणून सरस्वती विद्या मंदिर महाविद्यालय किनवटचे प्राध्यापक डॉ. तपन कुमार मिश्रा हे उपस्थित होते.
आपल्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी भाषा उत्पत्ती पासून ते भाषा हि काळाजात रुजलेली भाषा आहे असे प्रतिपादन त्यांनी केले जी की सर्व भारताला जोडण्याच काम करते भारतीय परंपरा भाषा यांचा संयोग कसा आहे ते समजावून सांगितले तथा सर्वेश्वर दयाल सक्सेना यांची रचना जब भी भुख से लडने कोई खडा हो जाता है सुंदर दिखने लगता है! या कवितेने समारोप केला तर अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे उपप्राचार्या कविता सोनकांबळे यांनी महाराष्ट्रात हिंदी भाषा अधिक बोलल्या जाते अटल बिहारी वाजपेयी यांची कविता उम्र की ऐसी की तैसी या माध्यमातून हिंदी भाषेबद्दल प्रेम व्यक्त केले .
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या तरंग या भितीपत्रकाद्वारे केली कु. कोमल कागदेवाड, पुनम अंबोरे, वैष्णवी मंदेवाड यांना स्वागत गीत सादर केले हिंदी विभाग अध्यक्ष प्रा.डॉ.संदीप पाईकराव हिंदी विभागात चालणाऱ्या गतीविधी बद्दल माहिती दिली.
हिंदी साहित्य परिषद बद्दल डॉ.सुनिल जाधव यांनी माहिती दिली.
प्रमुख पाहुणे मान्यवरांचा परिचय डॉ. विद्या सावते यांनी करून दिला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन साईनाथ शाहु यांनी केले तर सुत्र संचालन कु. रितुजा वाडवले कु. प्रीती जमदाडे यांनी केले तर काव्य पाठ कु. कोमल कागदेवाड, कु. शेख फिजा यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिंदी विभागाचे विद्यार्थी तथा महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी प्रयत्न केले या कार्यक्रमास असंख्य विद्यार्थी उपस्थिती होते.
Comments
Post a Comment