Skip to main content

भंते अनागारिक धर्मपाल यांची जयंती व भय्यासाहेब आंबेडकर स्मृत्तीदिना निमित्त अभिवादन कार्यक्रम


किनवट: येथुन जवळच असलेल्या गोकुंदा येथील सम्राट अशोक बुद्ध विहार राजर्षी शाहू नगर येथे भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा किनवट च्या वतीने दि.१७सप्टेंबर रोजी चैत्यभूमी चे शिल्पकार सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन व अनागारिक धम्मपाल यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.प्रारंभी प्रतिमा पुजन करुन संस्कार उपाध्यक्ष प्रा.सभाष गडलिंग व संस्कार सचिव बौद्धाचार्य अनिल उमरे यांनी वंदना घेतली.रिपाईचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष दादाराव कयापाक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरी बद्दल नांदेड येथे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित भारतीय बौध्द महासभेचे तालुका अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांचा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा व वार्ड शाखेचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते प्रमुख अतिथी सावित्री बाई फुले विचारमंचच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगीताई ठमके यांच्यासह भव्य सत्कार करण्यात आला .प्रमुख अतिथी भारतीय बौध्द महासभेचे तालुका सरचिटणीस प्राचार्य राजाराम वाघमारे, अखिल भारतीय बौध्द उपासक संघाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष उत्तम कानिंदे यांनी सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर व अनागारीक धम्मपाल यांच्या भारतातील धम्म प्रसार कार्यावर प्रकाश टाकला व सत्कारमूर्ती अभियंता प्रशांत ठमके यांनी सत्कार प्रसंगी किनवट तालुक्यातील मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळ व मातोश्री कमलताई ठमके बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अविरतपणे दैदिप्यमान शैक्षणिक कार्य करुन आदिवासी डोंगराळ भागात शैक्षणिक क्रांती केली तसेच भारतीय बौध्द महासभेच्या माध्यमातून धम्मचळवळ गतीमान करत सामाजिक सत्कार्य केल्याबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव केला.यावेळी सत्कारमूर्ती यांनी सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर व अनागारीक धम्मपाल यांच्या कार्याचा आढावा घेऊन विविध शाखेच्या वतीने भव्य सत्कार केल्याबद्दल आभार व्यक्त करत मला मिळालेला हा जीवनगौरव पुरस्कार हा माझा सन्मान नसून संस्थेच्या कार्याचा सन्मान असल्याचे प्रतिपादन केले. याप्रसंगी यश रामराव घुले व आदर्श साहेबराव वाढवे यांचा एम.बी.बी.एस.साठी निवड झाल्याबद्दल पालकांसह सत्कार करुन संस्थेच्या वतीने शुभांगी ठमके यांनी प्रत्येकी पाच-पाच हजार रुपये बक्षीस दिले.तसेच सुयश प्रशांत ठमकेचीही एम.बी.बी.एस.साठी निवड झाल्याबद्दल सत्कारमूर्तीचा सपत्नीक सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला.अध्यक्षियसमारोपात दादाराव कयापाक यांनी शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कार्य करणाऱ्या योग्य व्यक्तीची निवड करुन अभियंता प्रशांत ठमके यांना नांदेड येथे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नांदेड जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष महेंद्र नरवाडे यांनी केले तर वार्ड अध्यक्ष बंडू भाटशंकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.पंजाब शेरे,भारत कावळे, सुरेश पाटील, रमाकांत गायकवाड, प्रफुल डवरे,सतिश विणकरे,प्रवीण वाठोरे यांनी पुढाकार घेतला.यावेळी असंख्य उपासक उपासिका तसेच बौद्ध महासभेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला