Skip to main content

पुण्याच्या मराठवाडा समन्वय समितीचा डॉ.अशोक बेलखोडे यांना 'मराठवाडा भूषण' पुरस्कार जाहीर

 


किनवट,दि.  : मराठवाडा समन्वय समिती, पुणे च्या वतीने देण्यात येणारा सामाजिक क्षेत्रातील 'मराठवाडा भूषण' पुरस्कार किनवट येथील जेष्ठ समाजसेवक डॉ. अशोक बेलखोडे यांना नुकताच जाहीर झाला आहे.हा पुरस्कार  येत्या दि.१९ ला पुण्यात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

  मराठवाडा समन्वय समितीच्या वतीने २००९ सालापासून दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर पुणे, येथे मराठवाडा मुक्ती दिन महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमात मराठवाड्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्वान व्यक्तींना पुण्यातील तमाम मराठवाडा वासीय व पुणेकरांच्या वतीने 'मराठवाडा भूषण' पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.

  डॉ.बेलखोडे हे सामाजिक क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व आहेत. ते मागील तीस वर्षाहून अधिक काळ नांदेड जिल्ह्यातील किनवट परिसरातील आदिवासी समाजासाठी खूप मोठे सेवा कार्य करत आहेत. समाजातील विविध घटकांसाठी सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयी डॉ.बेलखोडे हे करत असलेले सेवा कार्य अतिशय प्रेरणादायी आहे. त्यांच्या  बहुमूल्य योगदानासाठी 'मराठवाडा समन्वय समिती' पुणे, यांच्या वतीने २०२४ सालातील सामाजिक क्षेत्रातील 'मराठवाडा भूषण' पुरस्कार डॉ.बेलखोडे यांना प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. गुरुवारी(ता.१९) सायंकाळी सहा वाजता बालगंधर्व रंगमंदिर, पुणे त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

 मागील वर्षापर्यंत दरवर्षी १७ सप्टेंबर रोजीच हा महोत्सव साजरा करण्यात येत होता. मात्र, यावर्षी १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी म्हणजेच गणपती विसर्जन आहे, त्यामुळे यावर्षीचा कार्यक्रम १९ सप्टेंबर रोजी आयोजित केला आहे,अशी माहिती मराठवाडा समन्वय समिती, पुणे चे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील व उपाध्यक्ष किशोर पिंगळीकर यांनी कळविली आहे.

-------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...