Skip to main content

श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय दहेली येथे सेवानिवृत्त शिक्षकांचा निरोप समारंभ व सपत्नीक सत्कार

 



किनवट/ प्रतिनिधी: श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय दहेली येथे सेवानिवृत्त शिक्षक श्री एस.जी.जावळे व जी.आर. पोटफळे यांचा निरोप समारंभ व सपत्नीक सत्कार समारंभ कार्यक्रम घेण्यात आला.

      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील पांडुरंग जोगी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्याध्यापक श्री पी आर वाडेकर, ( माजी मुख्याध्यापक), श्रीनिवास जाधव (तंटामुक्ती उपअध्यक्ष), आनंद भालेराव( संपादक किनवट टुडे न्यूज), शिवदास आप्पा लाटकर (सरपंच शेवडी), लक्ष्मण रामराव पोटफळे (भाजप जिल्हा उपाध्यक्ष नांदेड ग्रामीण), युसुफ पटेल (नगरसेवक नांदेड), नवनाथ शेळके (पंचायत समिती सदस्य लोहा), मोतीराम दरेगावे सावकार (सरपंच), शेख हुसेन मामू (सदस्य ग्रामपंचायत शेवडी), बालाजी मारोतराव पोटफळे ,विलासराव शिंदे भगवती, श्री गणेश सूर्यवंशी सर,  शिवाजी तूपकरी सर,कैलास डोळस सर,श्री भोपे सर, सर सौ.सुनिता भोपे, निलेश जावळे,शितल पोटफळे, श्री भालके सर, श्री राजेंद्र ठाकरे सर सिंदखेड,एम एस.जाधव सर,मंगेश परमेश्वर चव्हाण, धीरज मुळे, सौ दिपाली वाडकर, सुनिता शेंदलवार,सौ.  सविताताई शिवराज जावळे, शोभाताई  गंगाधर पोटफळे,सौ. स्नेहलता शितल पोटफळे,गिरीश पोटफळे,श्री शेटकर सर, भगत सर सारखणी आदि उपस्थित होते.

प्रथमतः मान्यवराच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

   तदनंतर श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय दहेली येथे सेवानिवृत्त शिक्षक श्री एस.जी.जावळे,व सौ.सविताताई शिवराज जावळे तसेच जी.आर. पोटफळे व सौ.शोभाताई  गंगाधर पोटफळे यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. दोघांनाही शाळेच्या वतीने कपडे रुपी आहेर देण्यात आले तसेच सर्व पाहुणे मंडळीचेही शाल श्रीफळ देऊन विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

   याप्रसंगी श्री जी आर पोटफळे यांनी शाळेला शाळेचे पहिले सचिव कै.टी एस माटाकर सर यांची प्रतिमा भेट म्हणून दिली.

याप्रसंगी श्री पी आर वाडेकर, आनंद भालेराव व श्री भोपे सर यांनी मनोगत व्यक्त केले

कार्यक्रमाचे सुरेख संचालन मधुसूदन पहुरकर यांनी केले.तर आभार प्रदर्शन सतीश राऊत यांनी केले.

  सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुनील जोगी शिक्षक श्री मधुसूदन पहुरकर, उल्हास राठोड, रामराव हुडेकर, सतीश राऊत, शेख सर, कैलास वाडकर, शिरगुरवार सर सुनील सराफ आदींनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला