Skip to main content

नीट वैद्यकीय प्रवेश परीक्षेत एम.के. टी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नो सायन्स च्या विद्यार्थ्यांचे सुयश !

 


किनवट,दि २: मनामध्ये जिद्द असेल तर कुठलेही कार्य कठीण नाही,अशाच प्रकारची प्रचिती नुकत्याच लागलेल्या नीट वैद्यकीय पात्रता परीक्षेच्या पहिल्या प्रवेश यादीतील निकालावरून स्पष्ट होते. योग्य मार्गदर्शन व सातत्यपूर्ण अभ्यास यांच्या बळावरती किनवट सारख्या आदिवासी, दुर्गम भागांमध्ये २ दोन वर्षांपूर्वी कार्यरत झालेल्या मातोश्री कमलताई ठमके इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नो सायन्स, गोकुंदा(ता. किनवट)मधील विद्यार्थ्यांची पहिल्या यादीत निवड होणे हे स्पष्ट करते,असे प्रतिपादन अभि. प्रशांत ठमके यांनी केले.



     आज(ता.२) महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालया मध्ये  निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते.

 मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्या शुभांगीताई ठमके, माजी प्राचार्य राजाराम वाघमारे, मुख्याध्यापक तथा प्राचार्य अंबादास जुनगरे व रामराव घुले हे उपस्थित होते.

  एम.के.टी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नो सायन्स चे विद्यार्थी सुयश प्रशांत ठमके यांने  नीट परीक्षेत ५९५ एवढे गुण घेऊन राजीव गांधी शासकीय वैद्यकीय

महाविद्यालय,ठाणे ,तर यश रामराव घुले यांने ५७७ एवढे गुण प्राप्त करून शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड येथे पहिल्याच प्रयत्नात प्रवेश मिळवला असल्यामुळे यशस्वी विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला.

   वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी  प्रवेश मिळावा म्हणून अनेक विद्यार्थी नांदेड सारख्या जिल्ह्याचे ठिकाणी राहून लाखो रुपये खर्च करून डॉक्टर बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत असतात. परंतु, आपले हे स्वप्न किनवट सारख्या भागामध्ये राहून सुद्धा पूर्ण होऊ शकत. ही बाब मातोश्री कमलताई ठमके इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नो सायन्स या संस्थेने सिद्ध करून दाखवली आहे. २५ विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचमधील २ विद्यार्थ्यांची निवड होणे हे निश्चितपणे भविष्यातील सुंदर यशाची नांदी आहे. हे यावरून स्पष्ट होते. इन्स्टिट्यूट मधील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन, अद्यावत ज्ञान, सुसज्ज अभ्यासिका यामुळे हे शक्य झाले असे, मत गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त  करताना मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.फैयाज आलम,प्रा.नैहाल अहमद,प्रा.शेख शब्बीर प्रा.सुघोष चव्हाण, उप मुख्याध्यापक प्रमोद मुनेश्वर, पर्यवेक्षक प्रा.इंगळे आर.व्ही, किशोर डांगे, सुभाष सूर्यवंशी, चव्हाण पी.पी.यांनी परिश्रम घेतले.

  कार्यक्रमास नीट व जेईई या परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी,पालक, परिसरातील नागरिक, प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,हे मोठ्या संख्येने उपस्थित होते,सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संतोष बैस ठाकूर यांनी केले तर आभार प्रा.सुबोध सर्पे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...