Skip to main content

नीचपुर ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचाराच चव्हाट्यावर.! जिल्हा स्तरिय समिती मार्फत चौकशीची मागणी.!

 


किनवट प्रतिनिधी:- सध्या संपूर्ण जिल्ह्यात गाजत असलेल्या किनवट तालुक्यातील नीचपुर ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचाराचा मुद्दा नांदेड जिल्हा परिषद कार्यालय समोर मागील 8 दिवसांपासून सुरू असलेल्या गावातील सामाजिक कार्यकर्ते, उप सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील व जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक यांनी उपोषणाला बसत तर काहींनी पाठींबा देत  मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांचा कडे दाद मागितली आहे परंतु आजपर्यंत सदरील प्रकरणी चौकशी होवून योग्य अहवाल प्रसिद्ध करन्यात आलेला नाही आहे.जसे वन विभाग कार्यालय समोर उपोषण कर्त्याचा मृत्यू झाला होता तसा कोणाचा मृत्यू झाल्यावरच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जाग येईल का.?असा भाबडा प्रश्न जनतेत चर्चिला जात आहे.न्याय न मिळाल्यास गावातील महिला त्यांचा हातातील बांगड्या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांचा दालनात फोडून निषेध व्यक्त करणारं असे आंदोलनातील महिलांनी बोलून दाखवले आहे.

  जिल्ह्याचा ठिकाणापासून 150 किमी दूर अंतरावर असलेल्या आदिवासी बहुल किनवट तालुका विकासापासून कायमचं मागास राहिलेला आहे किंबहुना राजकारण्यांचा दबावाने ठेवलेला आहे.जो नाममात्र निधी गावाचा विकास कामांसाठी येतो त्यातही 70 टक्के निधी भ्रष्टाचार करून लाटला जातो आणि उर्वरित 30 टक्के निधीत कामाचा दर्जा ढासळतो.आणि या दर्जाहीन कामावर आम्हीच विकास केला असा तोरा मिरवला जातो आहे.

  तालुक्यातील नीचपुर ग्रामपंचायत अंतर्गत भ्रष्टाचार झाला असा आरोप करत गावातील सामाजिक कार्यकर्ते, उप सरपंच व ग्रामपंचायत सदस्य दोन तीन महिन्यापूर्वी पंचायत समिती कार्यालय किनवट समोर आमरण उपोषणाला बसले होते.तेव्हा गट विकास अधिकारी यांनी ग्रामसेवकला तात्काळ माहिती देण्यास लावत चौकशी करण्याचे म्हंटले होते.परंतु सदरील प्रकरणी चौकशी आजपर्यंत कोणीही केली नसल्याने आणि ग्रामसेवकांने अपूर्ण माहिती देत ग्रामस्थांची दिशाभूल केल्याने सदरील भ्रष्टाचाराचा चौकशीचा मागणी साठी गावातील सामाजिक कार्यकर्ते,उप सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी मागील 8 दिवसांपासून जिल्हा परिषद कार्यालय नांदेड समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.सदरील माहिती दिलेल्या बँक स्टेटमेंट मधे चेक हा व्यक्तिशः देता येत नसतानाही कोणत्याही एजन्सीला चेक न देता गावातील महेश्वर मुंढे या नावाने चेक नंबर 998925 प्रमाणे 7 लक्ष,चेक नंबर 998931 प्रमाणे 5 लक्ष 38 हजार,चेक नंबर 998948 प्रमाणे 2 लक्ष 50 हजार,रामदास राठोड चेक नंबर 998937 प्रमाणे 5 लक्ष,चेक नंबर 998942 प्रमाणे 4 लक्ष,चेक नंबर 998950 प्रमाणे 2 लक्ष 74 हजार,चेक नंबर 998951 प्रमाणे 2 लक्ष 80 हजार,रामेश्वर विनायक चेक नंबर 998952 प्रमाणे 2 लक्ष 75 हजार,विजय मंगु राठोड चेक नंबर 998953 प्रमाणे 60 हजार,चेक नंबर 998947 प्रमाणे 

1 लक्ष 60 हजार, वैजनाथ रघुनाथ मुंढे चेक नंबर 998949 प्रमाणे 3 लक्ष 49 हजार,अमोल मच्छिंद्र चेक नंबर 998943 प्रमाणे 4 लक्ष,चेक नंबर 998934 प्रमाणे 5 लक्ष,चेक नंबर 998928 प्रमाणे 5 लक्ष,गजानन मच्छिंद्र 998927 प्रमाणे 10 लक्ष,चेक नंबर 998930 प्रमाणे 5 लक्ष 38 हजार,शिवकुमार रामा मुंढे 998936 प्रमाणे 4 लक्ष 35 हजार,मारोती दत्ता मुंढे चेक नंबर 998923 प्रमाणे 5 लक्ष आणि ग्रामसेवक राठोड व गट विकास अधिकारी यांचा संयुक्त खात्यातून   स्वतः दिनांक 04/11/2023 रोजी एकाच दिवशी उचल झालेली रक्कम चेक नंबर 998938 प्रमाणे 1 लक्ष 35 हजार,चेक नंबर 998939 प्रमाणे 3 लक्ष, चेक नंबर 998940 प्रमाणे 5 लक्ष, चेक नंबर 998941 प्रमाणे 5 लक्ष, चेक नंबर 998944 प्रमाणे 1 लक्ष 56 हजार रुपयांचा चेक इतरही काही चेक खाजगी व्यक्तींचा नावाने उचल करण्यात आलेले आहेत. या सर्वच खाजगी व्यक्तींचा नावाने आमचा गावाचा विकासाचा निधी उचलून भ्रष्टाचार केला असल्याचे उपोषण कर्त्यानी बँक स्टेटमेंटचा प्रति देत बोलून दाखवले आहे.सदरील प्रकरणी जिल्हा स्तरीय अधिकाऱ्यानं मार्फत आमचा समक्ष चौकशी न झाल्यास विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद समोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.