Skip to main content

नीचपुर ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचाराच चव्हाट्यावर.! जिल्हा स्तरिय समिती मार्फत चौकशीची मागणी.!

 


किनवट प्रतिनिधी:- सध्या संपूर्ण जिल्ह्यात गाजत असलेल्या किनवट तालुक्यातील नीचपुर ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचाराचा मुद्दा नांदेड जिल्हा परिषद कार्यालय समोर मागील 8 दिवसांपासून सुरू असलेल्या गावातील सामाजिक कार्यकर्ते, उप सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील व जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक यांनी उपोषणाला बसत तर काहींनी पाठींबा देत  मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांचा कडे दाद मागितली आहे परंतु आजपर्यंत सदरील प्रकरणी चौकशी होवून योग्य अहवाल प्रसिद्ध करन्यात आलेला नाही आहे.जसे वन विभाग कार्यालय समोर उपोषण कर्त्याचा मृत्यू झाला होता तसा कोणाचा मृत्यू झाल्यावरच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जाग येईल का.?असा भाबडा प्रश्न जनतेत चर्चिला जात आहे.न्याय न मिळाल्यास गावातील महिला त्यांचा हातातील बांगड्या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांचा दालनात फोडून निषेध व्यक्त करणारं असे आंदोलनातील महिलांनी बोलून दाखवले आहे.

  जिल्ह्याचा ठिकाणापासून 150 किमी दूर अंतरावर असलेल्या आदिवासी बहुल किनवट तालुका विकासापासून कायमचं मागास राहिलेला आहे किंबहुना राजकारण्यांचा दबावाने ठेवलेला आहे.जो नाममात्र निधी गावाचा विकास कामांसाठी येतो त्यातही 70 टक्के निधी भ्रष्टाचार करून लाटला जातो आणि उर्वरित 30 टक्के निधीत कामाचा दर्जा ढासळतो.आणि या दर्जाहीन कामावर आम्हीच विकास केला असा तोरा मिरवला जातो आहे.

  तालुक्यातील नीचपुर ग्रामपंचायत अंतर्गत भ्रष्टाचार झाला असा आरोप करत गावातील सामाजिक कार्यकर्ते, उप सरपंच व ग्रामपंचायत सदस्य दोन तीन महिन्यापूर्वी पंचायत समिती कार्यालय किनवट समोर आमरण उपोषणाला बसले होते.तेव्हा गट विकास अधिकारी यांनी ग्रामसेवकला तात्काळ माहिती देण्यास लावत चौकशी करण्याचे म्हंटले होते.परंतु सदरील प्रकरणी चौकशी आजपर्यंत कोणीही केली नसल्याने आणि ग्रामसेवकांने अपूर्ण माहिती देत ग्रामस्थांची दिशाभूल केल्याने सदरील भ्रष्टाचाराचा चौकशीचा मागणी साठी गावातील सामाजिक कार्यकर्ते,उप सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी मागील 8 दिवसांपासून जिल्हा परिषद कार्यालय नांदेड समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.सदरील माहिती दिलेल्या बँक स्टेटमेंट मधे चेक हा व्यक्तिशः देता येत नसतानाही कोणत्याही एजन्सीला चेक न देता गावातील महेश्वर मुंढे या नावाने चेक नंबर 998925 प्रमाणे 7 लक्ष,चेक नंबर 998931 प्रमाणे 5 लक्ष 38 हजार,चेक नंबर 998948 प्रमाणे 2 लक्ष 50 हजार,रामदास राठोड चेक नंबर 998937 प्रमाणे 5 लक्ष,चेक नंबर 998942 प्रमाणे 4 लक्ष,चेक नंबर 998950 प्रमाणे 2 लक्ष 74 हजार,चेक नंबर 998951 प्रमाणे 2 लक्ष 80 हजार,रामेश्वर विनायक चेक नंबर 998952 प्रमाणे 2 लक्ष 75 हजार,विजय मंगु राठोड चेक नंबर 998953 प्रमाणे 60 हजार,चेक नंबर 998947 प्रमाणे 

1 लक्ष 60 हजार, वैजनाथ रघुनाथ मुंढे चेक नंबर 998949 प्रमाणे 3 लक्ष 49 हजार,अमोल मच्छिंद्र चेक नंबर 998943 प्रमाणे 4 लक्ष,चेक नंबर 998934 प्रमाणे 5 लक्ष,चेक नंबर 998928 प्रमाणे 5 लक्ष,गजानन मच्छिंद्र 998927 प्रमाणे 10 लक्ष,चेक नंबर 998930 प्रमाणे 5 लक्ष 38 हजार,शिवकुमार रामा मुंढे 998936 प्रमाणे 4 लक्ष 35 हजार,मारोती दत्ता मुंढे चेक नंबर 998923 प्रमाणे 5 लक्ष आणि ग्रामसेवक राठोड व गट विकास अधिकारी यांचा संयुक्त खात्यातून   स्वतः दिनांक 04/11/2023 रोजी एकाच दिवशी उचल झालेली रक्कम चेक नंबर 998938 प्रमाणे 1 लक्ष 35 हजार,चेक नंबर 998939 प्रमाणे 3 लक्ष, चेक नंबर 998940 प्रमाणे 5 लक्ष, चेक नंबर 998941 प्रमाणे 5 लक्ष, चेक नंबर 998944 प्रमाणे 1 लक्ष 56 हजार रुपयांचा चेक इतरही काही चेक खाजगी व्यक्तींचा नावाने उचल करण्यात आलेले आहेत. या सर्वच खाजगी व्यक्तींचा नावाने आमचा गावाचा विकासाचा निधी उचलून भ्रष्टाचार केला असल्याचे उपोषण कर्त्यानी बँक स्टेटमेंटचा प्रति देत बोलून दाखवले आहे.सदरील प्रकरणी जिल्हा स्तरीय अधिकाऱ्यानं मार्फत आमचा समक्ष चौकशी न झाल्यास विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद समोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला