Skip to main content

प्रेषीत मोहम्मद पैगबंर यांच्या बद्दल आपत्तीजनक वक्तव्य केल्या बद्दल रामगीरी गंगातीरी महाराज यांच्यावर कायदेशीर कारवाई करा- टिपु सुलतान ब्रिगेड

 



किनवट तालुका प्रतिनिधी:-

रामगीरी महाराज यांनी मौजे पंचाळे ता. सिन्नर जि. नाशिक येथील अखंड हरीनाम सप्ताह कार्यक्रमात लाईव्ह प्रक्षेपण असतांना मुस्लीम धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल आक्षेपार्ह तसेच आपत्ती जनक वक्तव्य केल्या बद्दल मुस्लीम धर्मीयांच्या भावना दुखावल्या बद्दल यांच्या विरुद्ध कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी किनवट टिपु सुलतान ब्रिगेड यांच्या वतीने करण्यात आली आहे रामगीरी महाराज यांनी मो. पैगंबर हे पन्नासाव्या वर्षी सहा वर्षीय मुली सोबत विवाह केला असा आरोप त्यांनी केला तसेच इथेच न थांबता स्त्रिया वरती जे अत्याचार होतात त्यांचे आदर्शच अत्याचारी होते दहा हजार मुस्लीमा मध्ये शंभर हिंदु सुरक्षीत नाहीत असे सामाजिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य रामगिरी महाराज यांनी केले त्या बद्दल पोलीस प्रशासनाने कठोर पाऊले उचलावीत असे किनवट येथील दिलेल्या उपविभागिय अधिकारी कार्यालयास सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे

या निवेदनावर टिपु सुलतान बिग्रेड जिल्हाध्यक्ष सय्यद नदिम , तालुका उपाध्यक्ष शेख जुबेर, राजेंद्र विठ्ठलराव शेळके, अज्जु शेख, अकनीर खान, अमीर खान MIM, मोहमद अली, शेख सोनु, कार्तिक, दानीश खान, शोहेब खान , इरफान शेख, इमरान शेख, शेख साहिल, रेहान पठान, फईम खुरेशी शहर अध्यक्ष आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत रामगिरी महाराज यांच्यावर कारवाई करून अटक न झाल्यास तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा टिपु सुलतान बिग्रेड तर्फे देण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...