Skip to main content

प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय मागे घ्या : किनवट तालुका ग्राहक पंचायतीची मागणी

 


किनवट, ता.८(बातमीदार ) : राज्यात प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी किनवट तालुका ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष अॅड.मिलिंद सर्पे व सचिव सुरेश शेंडे  यांनी केली आहे.स्मार्ट मीटरमुळे सामान्य आणि गरीब कुटुंबाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

    राज्य सरकारचा हा निर्णय चुकीचा असून हा निर्णय रद्द करण्यात यावा. जनता आधीच महागाईचा चटका सोसत आहे. शहरातील अनेक कुटुंबे अस्थायी कामे करतात.हजारो लोकांचे मासिक उत्पन्न १० हजार ते १५ हजारांपेक्षा कमी आहे. अशा स्थितीत प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय अत्यंत अन्यायकारक आहे. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी महागाई भत्ता दिला जातो. सरकारी कार्यालयांमध्ये बिले भरण्याची जबाबदारी त्या विभागाची असते. त्यामुळे त्यांना फारसा फरक पडणार नाही. पण सामान्य माणसाला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो, असेही ग्राहक पंचायतीचे म्हणने आहे.

    नफा मिळवणाऱ्या कॉर्पोरेट घराण्यांच्या हितासाठी विजेला सुपर नफा कमावणाऱ्या कमोडिटीमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोपही ग्राहक पंचायतीच्या वतीने करण्यात आला. सध्याचे डिजिटल मीटर्स विजेचे प्रमाण अचूकपणे मोजण्यास सक्षम आहेत, मग सरकार हा प्रकल्प त्वरित कार्यान्वित करण्यास इतके उत्सुक का आहे, असा सवालही करण्यात आला. कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करून आणि कोट्यवधी डिजिटल मीटर डस्टबिनमध्ये टाकून स्मार्ट मीटर कोणाच्या हितासाठी बसवले जात आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

-------------------------------------------------------•मिलिंद सर्पे,बातमीदार,किनवट,ता.८/६/२०२४- 2:32PM

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला