Skip to main content

प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय मागे घ्या : किनवट तालुका ग्राहक पंचायतीची मागणी

 


किनवट, ता.८(बातमीदार ) : राज्यात प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी किनवट तालुका ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष अॅड.मिलिंद सर्पे व सचिव सुरेश शेंडे  यांनी केली आहे.स्मार्ट मीटरमुळे सामान्य आणि गरीब कुटुंबाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

    राज्य सरकारचा हा निर्णय चुकीचा असून हा निर्णय रद्द करण्यात यावा. जनता आधीच महागाईचा चटका सोसत आहे. शहरातील अनेक कुटुंबे अस्थायी कामे करतात.हजारो लोकांचे मासिक उत्पन्न १० हजार ते १५ हजारांपेक्षा कमी आहे. अशा स्थितीत प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय अत्यंत अन्यायकारक आहे. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी महागाई भत्ता दिला जातो. सरकारी कार्यालयांमध्ये बिले भरण्याची जबाबदारी त्या विभागाची असते. त्यामुळे त्यांना फारसा फरक पडणार नाही. पण सामान्य माणसाला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो, असेही ग्राहक पंचायतीचे म्हणने आहे.

    नफा मिळवणाऱ्या कॉर्पोरेट घराण्यांच्या हितासाठी विजेला सुपर नफा कमावणाऱ्या कमोडिटीमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोपही ग्राहक पंचायतीच्या वतीने करण्यात आला. सध्याचे डिजिटल मीटर्स विजेचे प्रमाण अचूकपणे मोजण्यास सक्षम आहेत, मग सरकार हा प्रकल्प त्वरित कार्यान्वित करण्यास इतके उत्सुक का आहे, असा सवालही करण्यात आला. कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करून आणि कोट्यवधी डिजिटल मीटर डस्टबिनमध्ये टाकून स्मार्ट मीटर कोणाच्या हितासाठी बसवले जात आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

-------------------------------------------------------•मिलिंद सर्पे,बातमीदार,किनवट,ता.८/६/२०२४- 2:32PM

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...