किनवट, ता.८(बातमीदार ) : राज्यात प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी किनवट तालुका ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष अॅड.मिलिंद सर्पे व सचिव सुरेश शेंडे यांनी केली आहे.स्मार्ट मीटरमुळे सामान्य आणि गरीब कुटुंबाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारचा हा निर्णय चुकीचा असून हा निर्णय रद्द करण्यात यावा. जनता आधीच महागाईचा चटका सोसत आहे. शहरातील अनेक कुटुंबे अस्थायी कामे करतात.हजारो लोकांचे मासिक उत्पन्न १० हजार ते १५ हजारांपेक्षा कमी आहे. अशा स्थितीत प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय अत्यंत अन्यायकारक आहे. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी महागाई भत्ता दिला जातो. सरकारी कार्यालयांमध्ये बिले भरण्याची जबाबदारी त्या विभागाची असते. त्यामुळे त्यांना फारसा फरक पडणार नाही. पण सामान्य माणसाला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो, असेही ग्राहक पंचायतीचे म्हणने आहे.
नफा मिळवणाऱ्या कॉर्पोरेट घराण्यांच्या हितासाठी विजेला सुपर नफा कमावणाऱ्या कमोडिटीमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोपही ग्राहक पंचायतीच्या वतीने करण्यात आला. सध्याचे डिजिटल मीटर्स विजेचे प्रमाण अचूकपणे मोजण्यास सक्षम आहेत, मग सरकार हा प्रकल्प त्वरित कार्यान्वित करण्यास इतके उत्सुक का आहे, असा सवालही करण्यात आला. कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करून आणि कोट्यवधी डिजिटल मीटर डस्टबिनमध्ये टाकून स्मार्ट मीटर कोणाच्या हितासाठी बसवले जात आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
-------------------------------------------------------•मिलिंद सर्पे,बातमीदार,किनवट,ता.८/६/२०२४- 2:32PM
Comments
Post a Comment